LG Manoj Sinha : जम्मू-काश्मीरचे नायब राज्यपाल मनोज सिन्हा(LG Manoj Sinha) यांच्या एका विधानाची सर्वत्र चर्चा पाहायला मिळत आहे. नायब राज्यपाल मनोज सिन्हा(LG Manoj Sinha) यांनी त्यांच्याकडे असणाऱ्या संवैधानिक अधिकारावर मिश्किल भाष्य केले आहे. ते म्हणाले, सर्वसामान्य जनतेला वाटते की, नायब राज्यपालांना सर्व अधिकार आहेत. माझ्याकडे पोलीस प्रशासनाचे अधिकार असून बाकी सर्व अधिकार जनतेने निवडून दिलेल्या राज्य सरकारकडे आहेत. कुलगाममधील कृषी कार्यक्रमात ते बोलत होते.(LG Manoj Sinha)
(हेही वाचा US Army Day : पाकिस्तानी लष्करप्रमुख मुनीर यांना अमेरिकेचं निमंत्रण?; व्हाईट हाऊसने दिलं स्पष्टीकरण )
शेतकऱ्यांनी पीक विमा योजनेत बागायतींचा समावेश करण्याची मागणी करताना ते म्हणाले, जम्मू-काश्मीरचे सरकार शेतकऱ्यांच्या मागण्यांवर सकारात्मक असू शकते. तसेच, दक्षिण काश्मीरमधील खुदवानी कुलगाम येथे आयोजित कृषी संकल्प अभियानाच्या समारोप समारंभात मनोज सिन्हा(LG Manoj Sinha) यांनी मिश्किलपणे नायब राज्यपालांच्या प्रशासकीय अधिकारांच्या मर्यादा स्पष्ट केल्या. विशेष म्हणजे, कार्यक्रमात सहभागी झालेल्या शेतकऱ्यांनी त्यांचे लक्ष विविध समस्यांकडे वेधत त्या सोडविण्याची मागणीही यावेळी केली.
(हेही वाचा PM Narendra Modi : १५ ते १९ जून दरम्यान विदेश दौऱ्यावर; पंतप्रधान ‘या’ देशांना पहिल्यांदाच देणार भेटी )
शेतकऱ्यांच्या मागण्यांचा उल्लेख करताना मनोज सिन्हा(LG Manoj Sinha) यांनी म्हटले, तुम्ही म्हणालात, आम्हाला काहीतरी द्या. मी तुम्हाला फक्त पोलीस कर्मचारी देऊ शकतो. बाकी सर्व काही, रस्ते, पाणी, वीज, शेती राज्य सरकारच देईल. जर सरकारने तुमच्या मागण्या मान्य केल्या तर मला कोणताही आक्षेप नाही असे स्पष्ट करतानाच राज्य सरकार शेती व शेतकऱ्यांच्या सर्वांगीण, समावेशक विकासासाठी वचनबध्द असल्याचेही त्यांनी सांगितले.(LG Manoj Sinha)
Join Our WhatsApp Community