Kundmala Bridge Accident : संजय राऊत यांची टीका उथळ व राजकीय; भाजपा नेते रविंद्र चव्हाणांचा घणाघात

42
Kundmala Bridge Accident : संजय राऊत यांची टीका उथळ व राजकीय; भाजपा नेते रविंद्र चव्हाणांचा घणाघात
  • प्रतिनिधी 

पुणे जिल्ह्यातील कुंडमळा येथे इंद्रायणी नदीवरचा पादचारी पूल मुसळधार पावसामुळे वाहून गेला आणि झालेल्या दुर्घटनेत मृत्यूमुखी पडलेल्यांप्रती संपूर्ण महाराष्ट्र शोकसागरात बुडालेला असताना, या घटनेवरून राजकारण तापले आहे. भाजपाचे प्रदेश कार्यकारी अध्यक्ष रविंद्र चव्हाण (Ravindra Chavan) यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत स्पष्ट शब्दांत ग्वाही दिली – “दुरुस्तीत हेतुपुरस्सर दिरंगाई झाली असल्यास संबंधितांवर कारवाई होणारच!” (Kundmala Bridge Accident)

संजय राऊतांवर खरमरीत टीका

शिवसेना उबाठाचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी या घटनेवरून केलेल्या टीकेला प्रत्युत्तर देताना चव्हाण (Ravindra Chavan) म्हणाले, “दु:खद घटनेतही केवळ राजकारण करण्याचा उद्देश ठेवून राऊतांनी केलेली टीका ही उथळ आणि अपरिपक्व विचारांचे प्रतिबिंब आहे. लोकशाहीत विरोध असतोच, पण अशा प्रसंगी जबाबदारीची भावना ठेवली पाहिजे.” (Kundmala Bridge Accident)

(हेही वाचा – Cabinet Decision : राज्य मंत्रिमंडळाचे महत्त्वाचे निर्णय वाचा एका क्लिकवर)

आठ कोटींच्या निधीला मिळाली होती मंजूरी – चव्हाण यांचा खुलासा

चव्हाण (Ravindra Chavan) यांनी माहिती दिली की, जुलै २०२४ मध्येच पूल दुरुस्तीच्या कामासाठी ८ कोटी रुपयांचा निधी अर्थसंकल्पातून मंजूर झाला होता. मात्र, त्याचवेळी विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू झाली. तांत्रिक प्रक्रिया, डिझाईन अंतिमीकरण, कार्यारंभ आदेश यामध्ये वेळ गेला असला तरी कुठे हेतुपूर्व दिरंगाई झाली असेल तर त्याची चौकशी होईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. (Kundmala Bridge Accident)

राऊतांना ‘अर्थसंकल्प वाचन’ पुस्तक भेट देणार – चव्हाणांची मिश्किल टोलेबाजी

राऊतांनी अर्थसंकल्पातील आकडे न समजल्यासारखे आरोप केल्याने चव्हाण (Ravindra Chavan) म्हणाले, “खासदार असूनही राऊतांना अर्थसंकल्प वाचता येत नाही याचे दु:ख आहे. त्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे ‘अर्थसंकल्प – सोप्या भाषेत’ हे पुस्तक आम्ही राऊतांना भेट देऊ.” (Kundmala Bridge Accident)

या पत्रकार परिषदेला भाजपा प्रदेश प्रवक्ते केशव उपाध्ये, माध्यम प्रमुख नवनाथ बन हे देखील उपस्थित होते. भाजपाचे मावळ तालुकाध्यक्ष रविंद्र भेगडे यांच्या पाठपुराव्यानंतर निधी मंजुरी झाली होती, अशी माहितीही यावेळी देण्यात आली. कुंडमळा पूल दुर्घटनेनंतर राज्यातील राजकारण पुन्हा तापले असून भाजपा व शिवसेना उबाठा यांच्यातील आरोप-प्रत्यारोपांना वेग आला आहे. मात्र या पार्श्वभूमीवर चव्हाण (Ravindra Chavan) यांच्या ठाम ग्वाहीमुळे या प्रकरणातील जबाबदारी ठरवण्यासाठी सरकार सज्ज असल्याचे संकेत मिळत आहेत. (Kundmala Bridge Accident)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.