Khalistan Movement : कॅनडामध्ये खलिस्तानी चळवळीच्या अस्ताला सुरुवात

71
Khalistan Movement : कॅनडामध्ये खलिस्तानी चळवळीच्या अस्ताला सुरुवात
Khalistan Movement : कॅनडामध्ये खलिस्तानी चळवळीच्या अस्ताला सुरुवात
  • सायली डिंगरे-लुकतुके

कॅनडाच्या न्यू डेमोक्रॅटिक पार्टीचे (New Democratic Party) नेते आणि खलिस्तान समर्थक जगमीत सिंग (Jagmeet Singh) यांचा तेथील संघीय निवडणुकीत पराभव झाला आहे. मार्क कार्नी (Mark Carney) यांच्या लिबरल पक्षाने सोमवार, २८ एप्रिल या दिवशी झालेल्या संघीय निवडणुकीत विजय मिळवला. जस्टिन ट्रुडो (Justin Trudeau) यांना पाठिंबा देणाऱ्या न्यू डेमोक्रॅटिक पार्टीने भारताविरुद्ध प्रचंड गरळओक केली होती. ट्रुडो यांच्या कार्यकाळात भारत-कॅनडा संबंध अलिकडच्या सर्वांत खराब टप्प्यावर आले आहेत.

न्यू डेमोक्रॅटिक पक्षाचे नेते जगमीत सिंग (Jagmeet Singh) स्वतः ब्रिटिश कोलंबियातील बर्नाबी सेंट्रल येथून निवडणूक हरले आहेत. एवढेच नाही, तर त्यांच्या न्यू डेमोक्रॅटिक पक्षाने राष्ट्रीय पक्षाचा दर्जाही गमावला आहे. राष्ट्रीय पक्षाला किमान १२ जागा हव्या होत्या; पण त्यांना फक्त ७ जागा मिळाल्या. या दारुण पराभवाची जबाबदारी स्वीकारत जगमीत सिंह (Jagmeet Singh) यांनी पक्षाध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. जगमीत सिंह गेल्या ८ वर्षांपासून पक्षाचे प्रमुख होते.(Khalistan Movement)

(हेही वाचा – India-Pakistan War : पाकड्यांना भारताच्या लष्करी कारवाईची भीती, इंग्लंडला पळून जाण्याचा इरादा)

खलिस्तानी चळवळीला धक्का

जगमीत सिंग यांच्या पक्षाचा दारूण पराभव कॅनडामधील (Canada) खलिस्तानवाद्यांसाठी मोठा धक्का मानला जात आहे. त्यांच्या पराभवामुळे भारत आणि कॅनडामधील राजनैतिक आणि व्यापारी संबंध पुन्हा स्थापित होण्यास मदत होईल. अलीकडच्या काळात, जगमीत सिंग आणि माजी पंतप्रधान जस्टिन ट्रूडो (Justin Trudeau) यांच्यातील युतीमुळे भारतासोबतचे राजनैतिक संबंध बिघडले होते. त्यांच्या सरकारने खलिस्तानी दहशतवादी हरदीपसिंग निज्जरच्या (Hardeep Singh Nijjar) हत्येत भारताचा सहभाग असल्याचा आरोपही केला. एवढेच नाही, तर पंतप्रधान ट्रुडो यांनी २०२० मध्ये भारतातील देशविरोधी शेतकरी आंदोलनाच्या बाजूने विधान केले होते. असे करणारे ते जगातील एकमेव नेते होते. (Khalistan Movement)

जगमीत सिंग (Jagmeet Singh) यांनी भारतावर केलेल्या टीकेमुळे राजनैतिक संघर्ष निर्माण झाला होता. त्यामुळेच त्यांना वर्ष २०१३ आणि २०१८ मध्ये भारताने व्हिसा नाकारला. राजकीय कारणांमुळे भारतात प्रवेश करण्यास बंदी घातलेले ते पाश्चात्य देशातील पहिले आमदार असल्याचे बोलले जाते. भारताने ट्रुडो प्रशासनावर खलिस्तानवाद्यांबद्दल मवाळ भूमिका स्वीकारल्याचा आरोपही केला होता. गेल्या काही वर्षांत सातत्याने कॅनडातील सार्वजनिक ठिकाणांवर भारतविरोधी घोषणा लिहिल्या जात आहेत, तसेच खलिस्तानी कारवाया केल्या जात आहेत. (Khalistan Movement)

आता नवीन परिस्थितीत खलिस्तानवादी चळवळीवर नियंत्रण मिळवले जाऊ शकते, तसेच भारत-कॅनडा संबंध सुधारू शकतात, असे सांगितले जात आहे.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.