Karnataka Government : भगवान हनुमानाचे जन्मस्थान मानल्या जाणाऱ्या अंजनेय मंदिर प्रकरणात कर्नाटक सरकार(Karnataka Government)ला मोठा धक्का बसला आहे. अंजनेय मंदिराच्या मुख्य पुजाऱ्याला हटवून मंदिर ताब्यात घेण्याचा प्रयत्नांना सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे. दरम्यान, कर्नाटकातील काँग्रेस सरकार(Karnataka Government) भगवान हनुमानाचे जन्मस्थान ताब्यात घेण्याकरिता अंजनेय मंदिराच्या मुख्य पुजाऱ्याला हटवण्याचा कट रचण्यात आला होता.(Karnataka Government)
राज्यातील कोप्पल येथील अंजनेय मंदिराचे मुख्य पुजारी विद्यादास यांना केवळ पूजा करण्यापासून रोखले नाही तर त्यांच्या निवासस्थानाची वीज तोडण्यात आली. तसेच, त्यांना मंदिरातून काढून टाकण्याचा कट रचण्यात आला, प्रकरणात अडकवण्याचा प्रयत्नही करण्यात आल्याचे समोर आले. त्यानंतर आता सर्वोच्च न्यायालयाने याप्रकरणी कर्नाटक सरकारच्या निर्णयाला स्थगिती दिल्यानंतर काँग्रेसी मानसिकतेला हाणून पाडण्यात आले आहे.
(हेही वाचा US Student Visa : अमेरिकेची डाव्या विचारसरणीच्या विद्यार्थ्यांवर कारवाई; सोशल मीडिया प्रोफाइलची तपासणी कडक )
अंजनेय मंदिराचा वाद आता सर्वोच्च न्यायालयात पोहोचला असून काँग्रेस सरकारने मंदिराचे मुख्य पुजारी विद्यादास बाबाजी यांना हटवून मंदिर ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला होता. तथापि, सर्वोच्च न्यायालयाने त्यांच्या निर्णयाला स्थगिती दिल्याने काँग्रेस सरकारचे मनसुबे आता उघडकीस आले आहेत. या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले की, विद्यादास बाबाजी मंदिरात पूजा करत राहतील आणि त्यांना मंदिराच्या आवारात एका खोलीत राहण्याची सुविधा दिली जाईल. मार्च २०२५ मध्ये सरकारने पुजारी हटवण्याचे प्रयत्न तीव्र केल्यानंतर हा निर्णय न्यायालयाकडून देण्यात आला आहे.
कर्नाटकातील काँग्रेस सरकारवर गंभीर प्रश्न उपस्थित
अंजनेय मंदिर प्रकरणामुळे काँग्रेस सरकारच्या हेतूंवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत. हिंदू समुदायासाठी मंदिर श्रद्धेचे केंद्र असून सरकारच्या ताब्यात घेण्याच्या भूमिकेमुळे हे धार्मिक परंपरांशी छेडछाड आहे. विद्यादास यांनी उच्च न्यायालयात अवमान याचिका दाखल केली होती. परंतु, ९ एप्रिल २०२५ रोजी उच्च न्यायालयाने ती फेटाळून लावली. यानंतर, सर्वोच्च न्यायालयाचा हा निर्णय हिंदू समुदायासाठी दिलासा देणारा आहे. तथापि, न्यायालयाचा अंतिम निर्णय प्रलंबित असून सध्या विद्यादास बाबाजी मंदिरात पूजा करू शकतात, असा निर्वाळा सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे.
कर्नाटकातील कोपल जिल्ह्यातील अंजनेय मंदिर
तुंगभद्रा नदीच्या काठावर अंजनेय टेकडीवर असलेले अंजनेय मंदिर हे बजरंग बली यांचे जन्मस्थान मानले जाते. मंदिर हिंदूंसाठी अतिशय पवित्र असून विद्यादास बाबाजी हे या मंदिराचे मुख्य पुजारी आहेत. रामानंदी समुदाय गेल्या १२० वर्षांपासून मंदिरात पूजा करत आहेत. परंतु, २०१८ मध्ये कर्नाटक सरकारने मंदिराचे व्यवस्थापन बेकायदेशीरपणे ताब्यात घेतल्याचा आरोप करण्यात आला. जिल्हाधिकाऱ्यांनी कर्नाटक हिंदू धार्मिक संस्था आणि धर्मादाय देणगी कायदा, १९९७ च्या कलम २३ अंतर्गत मंदिर ताब्यात घेण्याचे आदेश दिले. त्यानंतर विद्यादास यांना काढून टाकण्याचे प्रयत्न सुरू झाले.
यानंतर मंदिराचे पुजारी विद्यादास यांनी या निर्णयाविरुद्ध कर्नाटक उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. १४ फेब्रुवारी २०२३ रोजी उच्च न्यायालयाने अंतरिम आदेश देताना म्हटले की, विद्यादास यांना मंदिरात पूजा करण्यापासून रोखू नये आणि त्यांच्याविरुद्ध कोणतीही कठोर कारवाई करू नये. परंतु, राज्यातील काँग्रेस सरकारने न्यायालयाच्या आदेशांकडे दुर्लक्ष करत मार्च २०२५ मध्ये कोप्पल येथील स्थानिक प्रशासनाच्या मदतीने विद्यादास यांना पूजा करण्यापासून रोखले होते.(Karnataka Government)
Join Our WhatsApp Community