India Pakistan War : युद्ध थांबलं पण दहशतवादविरुद्ध कारवाई थांबणार नाही ; केंद्र सरकारचा पाकड्यांना इशारा

India Pakistan War : युद्ध थांबलं पण दहशतवादविरुद्ध कारवाई थांबणार नाही ; केंद्र सरकारचा पाकड्यांना इशारा

91
India Pakistan War : युद्ध थांबलं पण दहशतवादविरुद्ध कारवाई थांबणार नाही ; केंद्र सरकारचा पाकड्यांना इशारा
India Pakistan War : युद्ध थांबलं पण दहशतवादविरुद्ध कारवाई थांबणार नाही ; केंद्र सरकारचा पाकड्यांना इशारा

ऑपरेशन सिंदूरला घाबरून पाकड्यांची पळता भुई थोडी झाली होती. प्रतिहल्ल्यांनी पाकिस्तानी (India Pakistan War) सैन्याची दाणादाण उडाल्यानंतर भारत आणि पाकिस्तान यांच्यात शनिवारी संध्याकाळी शस्त्रसंधी करण्याचा करार झाला होता. अमेरिकेच्या मध्यस्थीने युद्धविराम झाला. राज्याचे परराष्ट्र मंत्री जयशंकर यांनी देखील ट्विट करुन याबाबत माहिती दिली. मात्र, दहशतवादाविरुद्ध भारताची भूमिका कायम अशीच राहिल, असेही एस. जयशंकर यांनी ठणकावून सांगितलं आहे. (India Pakistan War)

”भारत आणि पाकिस्तान यांच्यातील गोळीबार आणि सैन्य दलाच्या कारवायांना थांबविण्यास दोन्ही बाजूंनी सहमती दर्शविण्यात आली आहे. पण, भारताने सर्वच ताकदीनीशी दहशतवादाविरुद्ध आपली भूमिका सातत्याने स्पष्ट केली. सैन्य कारवाया थांबल्या पण दहशतवादाविरुद्धची हीच भूमिका यापुढे देखील कायम राहिल.” असा इशारा जयशंकर यांनी दिला आहे. (India Pakistan War)

हेही वाचा-India Pakistan War : “पाकिस्तानी हारे तो पलटके… ” ; पाकच्या शस्त्रसंधी उल्लंघनानंतर ‘लक्ष्य’मधील डायलॉगचा Video Viral

दरम्यान, 22 एप्रिल रोजी पहलगाम येथे झालेल्या हल्ल्यानंतर दोन्ही देशांच्या सीमारेषेवर तणावर होता. या तणावानंतर भारताने 7 मे रोजी एअर स्ट्राईक करत पाकिस्तानमधील 9 दहशतवादी तळांना लक्ष्य केलं होतं. त्यानंतर, भारत आणि पाकिस्तान यांच्या युद्धजन्य परिस्थिती उद्भवली. दोन्ही बाजूंनी गोळीबार आणि हवाई हल्ले सुरू होते. अखेर, या हल्लेखोरीला अखेर युद्ध विराम मिळाला आहे. (India Pakistan War)

हेही पहा-

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.