Operation Sindoor मधून भारताने जगाला दिला ‘हा’ संदेश !

Operation Sindoor मधून भारताने जगाला दिला 'हा' संदेश !

68
Operation Sindoor मधून भारताने जगाला दिला 'हा' संदेश !
Operation Sindoor मधून भारताने जगाला दिला 'हा' संदेश !

ऑपरेशन सिंदूरला (Operation Sindoor) घाबरून पाकड्यांची पळता भुई थोडी झाली होती. प्रतिहल्ल्यांनी पाकिस्तानी (India Pakistan War) सैन्याची दाणादाण उडाली होती. भारताने सर्वच ताकदीनीशी दहशतवादाविरुद्ध आपली भूमिका सातत्याने स्पष्ट केली आहे. भारताने सीमेपलीकडून काहीही कारवाई झाली तर भारत ठोस प्रत्युत्तर देणार असल्याचे सांगण्यात आले आहे. (Operation Sindoor)

हेही वाचा-पाकच्या पंतप्रधानांनी मानले सहयोगी देशांचे आभार ; Shehbaz Sharif आणि सैन्य दलात संघर्ष सुरूच …

पाकिस्तानविरुद्धच्या संघर्षात भारताच्या हवाई संरक्षण प्रणालीने जोरदार कामगिरी केली. पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानला जोरदार प्रत्युत्तर दिले. अगदी पाकिस्तानला गुडघे टेकण्यास भाग पडले. त्यामुळे पाकिस्तानकडे आत्मसमर्पण करण्याशिवाय दुसरा मार्ग नव्हता. स्वदेशी बनावटीचे आकाश क्षेपणास्त्रे, बराक-८ एमआरएसएएम, ड्रोनविरोधी तंत्रज्ञान आणि हारोप ड्रोन यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. भारताने संरक्षण यंत्रणेद्वारे जगाला आपली ताकद दाखवून दिली आहे. (Operation Sindoor)

हेही वाचा- India Pakistan War : युद्ध थांबलं पण दहशतवादविरुद्ध कारवाई थांबणार नाही ; केंद्र सरकारचा पाकड्यांना इशारा

पाकिस्तानने शेकडो ड्रोन वापरून भारताच्या संरक्षण यंत्रणा नष्ट करण्याचा प्रयत्न केला. परंतु पाकिस्तानच हा प्रयत्न भारताने उधळून लावला. पाकिस्तानच्या मध्यम ते लांब पल्ल्याच्या क्षेपणास्त्रांनी भारताच्या हवाई संरक्षण यंत्रणेत घुसखोरी करण्याचा प्रयत्न केला. परंतु त्यांचे सर्व नापाक प्रयत्न अयशस्वी ठरले. एस-४०० हवाई संरक्षण प्रणालीने सर्व हल्ले पूर्णपणे हाणून पाडले आहेत. भारत आणि पाकिस्तान संघर्षाच्या माध्यमातून भारताने आपल्या सर्व प्रगत आणि स्वदेशी लष्करी उपकरणांची यशस्वी चाचणी घेतली. त्यामुळे भारताकडे जगातील सर्वोत्तम लढाऊ विमाने आहेत, हे सिद्ध झाले. (Operation Sindoor)

हेही वाचा-  India Pakistan War : “पाकिस्तानी हारे तो पलटके… ” ; पाकच्या शस्त्रसंधी उल्लंघनानंतर ‘लक्ष्य’मधील डायलॉगचा Video Viral

भारताने पाकिस्तानसोबतच्या संघर्षात राफेल, तेजस आणि आकाश क्षेपणास्त्रांचा वापर करून पाकिस्तानवर वज्रप्रहार केला. त्याच वेळी पाकिस्तानची हवाई संरक्षण प्रणाली पूर्णपणे अयशस्वी ठरली. भारतीय हवाई दलाने जागतिक स्तरावर आपली क्षमता दाखवून दिली आहे. भारताच्या हवाई हल्ल्यात लाहोरस्थित मुख्यालय-९ हवाई संरक्षण युनिट आणि अनेक रडार नष्ट करण्यात आले. ९ दहशतवादी तळ, ५ मुख्य दहशतवादी, पाकची फतेह २ बॅलेस्टीक मिसाईल हवेतच नष्ट करण्यात आली, रावळपिंडी स्टेडिअम, कराची पोर्ट भारताने उद्धवस्त केले. भारताच्या प्रगत लढाऊ विमानांनी पाकिस्तानच्या अनेक हवाई तळांवर अचूक मारा करून त्यांना नष्ट केले. त्यामुळे पाकिस्तानचे मोठे नुकसान झाले. (Operation Sindoor)

हेही वाचा-  Pakistan कडून शस्त्रसंधीचे उल्लंघन; गोळीबारात BSF जवान मोहम्मद इम्तियाज हुतात्मा, ७ जण जखमी

भारत आणि पाकिस्तान दरम्यान युद्धविराम झाल्यानंतर दोन्ही देशांच्या लष्कारी अधिकाऱ्यांची सोमवारी बैठक होणार आहे. (Operation Sindoor)

हेही पहा-

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.