India-Croatia Ties : भारत आणि क्रोएशियामध्ये अनेक महत्त्वाचे करार; पंतप्रधान मोदी म्हणाले, दहशतवाद हा…

14
पंतप्रधान नरेंद्र मोदी विदेश दौऱ्यावर असून बुधवारी १८ जूनला क्रोएशिया येथे पोहोचले. सायप्रसच्या अधिकृत भेटीनंतर आणि कॅनडामध्ये झालेल्या G7 शिखर परिषदेत सहभागी झाल्यानंतर पंतप्रधान मोदी क्रोएशियाला पोहोचले. भारतीय पंतप्रधानांचा क्रोएशियाला हा पहिलाच दौरा आहे, जो दोन्ही देशांसाठी ऐतिहासिक मानला जात आहे. क्रोएशिया येथील झाग्रेबमध्ये भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि क्रोएशियाचे पंतप्रधान आंद्रे प्लेनकोविक (Croatia PM Andre Plenkovic) यांच्या उपस्थितीत भारत आणि क्रोएशिया यांच्यात अनेक महत्त्वाचे करार करण्यात आले. (India-Croatia Ties)

(हेही वाचा – वर्धापन दिनाआधीच उपमुख्यमंत्री Eknath Shinde यांनी व्यंगचित्रातून डागली शिवसेना उबाठावर ‘राजकीय तोफ’)

पंतप्रधान मोदींचे स्वागत 
पंतप्रधान मोदी म्हणाले, ‘मी क्रोएशियाचे पंतप्रधान आंद्रे प्लेनकोविक आणि येथील सरकारचे मनापासून आभार मानतो, ज्यांनी माझे या सुंदर भूमीवर प्रेमाने स्वागत केले.’ पुढे असेही म्हटले की, भारत आणि क्रोएशिया हे लोकशाही तसेच कायद्याचे राज्य, विविधता यासारख्या सामायिक मूल्यांनी जोडलेले आहेत.
आर्थिक आणि तांत्रिक सहकार्यावर भर
पंतप्रधान मोदी म्हणाले की, भारताच्या सागरमाला प्रकल्पांतर्गत बंदर आधुनिकीकरण, किनारी क्षेत्रांचा विकास आणि  मल्टी-मोडल कनेक्टिविटी यासारख्या क्षेत्रात क्रोएशियन कंपन्यांसाठी मोठी संधी आहेत. तसेच भारत क्रोएशियासोबत शैक्षणिक संस्थांमध्ये संशोधन आणि सहकार्याला प्रोत्साहन देईल.
संस्कृती आणि लोकांच्या संबंधांना नवी बळकटी
झाग्रेब विद्यापीठातील हिंदी अध्यासनाचा कार्यकाळ २०३० पर्यंत वाढवण्यात आला आहे आणि पुढील पाच वर्षांसाठी सांस्कृतिक देवाणघेवाण कार्यक्रम देखील तयार करण्यात आला आहे, अशी माहिती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली. याशिवाय, लवकरच एक वाहतूक करार देखील पूर्ण होईल ज्यामुळे दोन्ही देशांच्या लोकांची हालचाल सुलभ होईल.

(हेही वाचा – Iran-Israel conflict : इस्रायलचा इराणच्या अणुऊर्जा केंद्रावर हल्ला; सेंट्रिफ्यूज सुविधा उद्ध्वस्त)

दहशतवाद हा मानवतेचा शत्रू आहे – पंतप्रधान मोदी
यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, ‘आम्ही सहमत आहोत की दहशतवाद हा मानवतेचा शत्रू आहे. तो लोकशाहीवर विश्वास ठेवणाऱ्या शक्तींविरुद्ध आहे. २२ एप्रिल रोजी भारतात झालेल्या दहशतवादी हल्ल्याबद्दल पंतप्रधान आणि क्रोएशिया सरकार यांनी दिलेल्या शोकसंवेदनाबद्दल आम्ही त्यांचे मनापासून आभारी आहोत. अशा कठीण काळात आमच्या मित्र देशांचा पाठिंबा आमच्यासाठी खूप मौल्यवान होता. आजच्या जागतिक वातावरणात भारत आणि युरोपमधील भागीदारी खूप महत्त्वाची आहे यावर आम्ही दोघेही सहमत आहोत. युरोपियन युनियनसोबतची आमची धोरणात्मक भागीदारी मजबूत करण्यासाठी क्रोएशियाचा पाठिंबा आणि सहकार्य खूप महत्त्वाचे आहे. आम्ही दोघेही या वस्तुस्थितीचे समर्थन करतो की युरोप असो वा आशिया, समस्यांचे निराकरण युद्धभूमीतून होऊ शकत नाही. संवाद आणि राजनयिकता हा एकमेव मार्ग आहे.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.