पाकिस्तान जिंदाबाद म्हणतील त्यांचे पाय तोडा; CM Himanta Biswa Sarma यांचे पोलिसांना आदेश

आपल्याला आपला आसाम आणि भारत मजबूत करायचा आहे. भारतात जेवतात आणि नंतर पाकिस्तानची स्तुती करतात अशा लोकांची आपल्याला गरज नाही, असेही मुख्यमंत्री सरमा CM Himanta Biswa Sarma म्हणाले.

101

आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा (CM Himanta Biswa Sarma) यांनी पाकिस्तान समर्थकांना इशारा दिला आहे. राज्यात ‘पाकिस्तान झिंदाबाद’चा नारा देणाऱ्यांचे पाय पोलिस तोडतील, असे त्यांनी म्हटले आहे. आसाममधील धुबरी येथील एका रॅलीत त्यांनी ही घोषणा केली. त्यांनी दहशतवाद्यांना कठोर शिक्षा देण्याची वकिली केली आहे.

(हेही वाचा Pakistan च्या उत्पादनांना भारतात नो एन्ट्री; मोदी सरकारचा आणखी एक अटॅक)

ते म्हणाले, “पाकिस्तानी दहशतवादी आले आणि त्यांनी निष्पाप लोकांना मारले, पण आमच्यातील काही लोक ‘पाकिस्तान जिंदाबाद’ म्हणत आहेत. आम्ही त्यापैकी अनेकांना अटक केली आहे आणि जर कोणी ‘पाकिस्तान जिंदाबाद’ असे म्हटले तर आम्ही त्याचे पाय तोडू. म्हणूनच मी पोलिसांना ‘पाकिस्तान जिंदाबाद’ म्हणणाऱ्यांचे चेहरे पाहू नका, त्यांना कायद्यानुसार अटक करा आणि त्यांचे पाय तोडण्याचे निर्देश दिले आहेत. आपल्याला आपला आसाम आणि भारत मजबूत करायचा आहे. भारतात जेवतात आणि नंतर पाकिस्तानची स्तुती करतात अशा लोकांची आपल्याला गरज नाही, असेही मुख्यमंत्री सरमा CM Himanta Biswa Sarma म्हणाले.

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.