“जर दहशतीचा कणा पुन्हा उभा राहिला तर…” ; PM Modi यांचा पाकला सूचक इशारा

"जर दहशतीचा कणा पुन्हा उभा राहिला तर..." ; PM Modi यांचा पाकला सूचक इशारा

107
"जर दहशतीचा कणा पुन्हा उभा राहिला तर..." ; PM Modi यांचा पाकला सूचक इशारा

पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) यांनी बिहारमधील दुर्गाडीह येथे एका जाहीर सभेला संबोधित करताना पाकला सूचक इशारा दिला. ते म्हणाले, “येथील लोकांना माहित आहे की, भगवान राम आणि त्यांच्या वंशाची प्रथा काय होती. प्राण जाये पर वचन ना जाये प्रभु श्री रामाची ही प्रथा भारताचे धोरण बनली आहे. पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यात निष्पाप लोक मारले गेले. या हल्ल्याच्या दुसऱ्या दिवशी मी बिहारला आलो. मी बिहारच्या भूमीवरून देशाला वचन दिले होते. दहशतवाद्यांचे अड्डे जमीनदोस्त केले जातील. कल्पनेपेक्षा मोठी शिक्षा मिळेल. आज जेव्हा मी बिहारमध्ये आलो आहे, तेव्हा मी माझे वचन पूर्ण करून आलो आहे.” असे त्यांनी सांगितले. (PM Modi)

“ज्यांनी पाकिस्तानात बसून आमच्या बहिणींचे सिंदूर नष्ट केले होते. आमच्या सैन्याने त्यांचे अड्डे उध्वस्त केले. पाकिस्तान आणि जगाने भारताच्या मुलींच्या सिंदूरची शक्ती देखील पाहिली. शत्रूला हे माहित असले पाहिजे की ‘ऑपरेशन सिंदूर’ हा आपल्या भात्यातील फक्त एक बाण आहे. भारताचा लढा थांबलेला नाही. जर दहशतीचा कणा पुन्हा उभा राहिला तर आम्ही त्याला त्याच्या बिळातून बाहेर काढू आणि चिरडून टाकू. मग ते सीमेपलीकडे असो किंवा सीमेच्या आत.” (PM Modi)

पंतप्रधान मोदी म्हणाले, आमचे सरकार बिहारमधील शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्यासाठी सतत काम करत आहे. आमच्या सरकारने मखाना बोर्डाची घोषणा केली आणि जीआय टॅग दिला. यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत मागणी वाढेल. १४ पिकांच्या एमएसपीमध्ये वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. बिहारमध्ये जागतिक दर्जाच्या गाड्या धावत आहेत. रेल्वेचेही आधुनिकीकरण केले जात आहे. हे आधीच करता आले असते, परंतु यासाठी जबाबदार असलेल्यांनी नोकरीच्या नावाखाली गरिबांच्या जमिनी लुटल्या. सामाजिक न्यायाच्या या त्यांच्या पद्धती होत्या. गरिबांना लुटत होते आणि स्वतः राजेशाही जीवनाचा आनंद घेत होते. (PM Modi)

“जेव्हा सुरक्षितता आणि शांतता असते तेव्हाच विकासाचे नवे मार्ग उघडतात. नितीशजींच्या नेतृत्वाखाली जंगल राज हद्दपार झाले तेव्हा बिहार विकासाच्या मार्गावर वाटचाल करू लागला. २०१४ पूर्वी १२५ जिल्हे नक्षलग्रस्त होते, आता फक्त १८ जिल्हे नक्षलग्रस्त आहेत. आता सरकार रस्ते आणि रोजगार पुरवत आहे. तो दिवस दूर नाही जेव्हा माओवादी हिंसाचार पूर्णपणे नष्ट होईल. ऑपरेशन सिंदूरमध्ये जगाने आपल्या सैन्याचे अभूतपूर्व धैर्य आणि अदम्य वृत्ती पाहिली. बीएसएफ इन्स्पेक्टर इम्तियाज हे ७ मे रोजी मातृभूमीसाठी कर्तव्य बजावताना हुतात्मा झाले. बिहारच्या शहीद सुपुत्राला मी श्रद्धांजली अर्पण करतो.” असं पंतप्रधान मोदी यावेळी म्हणाले. (PM Modi)

हेही पहा-

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.