
-
प्रतिनिधी
मुंबई उपनगरी रेल्वेच्या दिवा ते मुंब्रा स्थानकादरम्यान घडलेली भीषण दुर्घटना ही अत्यंत दु:खद आणि मन हेलावणारी आहे, असे म्हणत वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख ॲड. प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी भारतीय रेल्वेच्या कार्यपद्धतीवर तीव्र शब्दांत टीका केली आहे.
“ही केवळ अपघाताची घटना नाही, तर एक गंभीर चेतावणी आहे. सोशल मीडियावर रील्स अपलोड करण्याइतपत वेळ असलेल्या रेल्वे प्रशासनाने जर प्रवाशांच्या सुरक्षेकडे लक्ष दिलं असतं, तर आज निष्पाप प्रवाशांचे प्राण गेले नसते,” अशा संतप्त भावना त्यांनी ट्विटरवरून व्यक्त केल्या.
(हेही वाचा – तरुणाईला Veer Savarkar उमगायला लागले की, हिंदु राष्ट्र निर्माण होईल; गीता उपासनी यांनी व्यक्त केला विश्वास)
‘प्रशासन फॅन्सी व्हिडीओपेक्षा प्रवाशांच्या जिवाला प्राधान्य देईल का?’
आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी केलेल्या ट्विटमध्ये भारतीय रेल्वेच्या गोंडस सोशल मीडिया प्रचारावर रोष व्यक्त करत, प्रशासनाने दिखाऊपणा बाजूला ठेवून प्रत्यक्ष सुरक्षेवर लक्ष केंद्रीत करावे, अशी स्पष्ट मागणी केली आहे.
सखोल चौकशीची मागणी; जबाबदारी निश्चित होणे आवश्यक – आंबेडकर
“मी शासनाकडे आणि रेल्वे प्रशासनाकडे या दुर्घटनेची सखोल, निष्पक्ष आणि पारदर्शक चौकशी करण्याची मागणी करतो. संपूर्ण सत्य जनतेसमोर आले पाहिजे, आणि जबाबदारी निश्चित होणं गरजेचं आहे,” असेही आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी ठामपणे सांगितले.
(हेही वाचा – ‘आपल्या देशात माणसांची किंमत नाही’; मुंबई लोकल दुर्घटनेवर Raj Thackeray संतापले )
‘दु:खाच्या वेळी संवेदनशीलतेची गरज’
या दुर्घटनेत मृत्यूमुखी पडलेल्या प्रवाशांच्या कुटुंबीयांना तातडीची आर्थिक मदत व जखमींना उत्तम वैद्यकीय उपचार देण्यासाठी सरकारने तत्परता दाखवावी, असेही त्यांनी नमूद केले.
‘ही अपघात नव्हे, एक सिस्टम फेलियर’
“या दुर्घटनेकडे फक्त एक अपघात म्हणून न पाहता, संपूर्ण सुरक्षा व्यवस्थेच्या अपयशाचं प्रतीक म्हणून बघितलं पाहिजे. भविष्यात अशी घटना पुन्हा घडू नये यासाठी मूलगामी सुधारणा आणि धोरणात्मक कृती आवश्यक आहे,” अशा शब्दांत आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी प्रशासनाला स्पष्ट इशारा दिला.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community