Himanta Biswa Sarma : राज्यातील शांतता बिघडविणाऱ्यांना दिसताच गोळ्या घाला, असे थेट आदेशच पोलिसांना आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिसवा सरमा(Himanta Biswa Sarma) यांनी दिले. धुबरी येथील हनुमान मंदिराबाहेर गोमातेचे शिर आढळल्यानंतर तणावाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री सरमा(Himanta Biswa Sarma) यांनी महत्त्वाचे निर्देश राज्यातील पोलीस प्रशासनाला दिले आहेत. दरम्यान, या प्रकरणी पोलिसांकडून आतापर्यंत ३८ जणांना अटक करण्यात आली असून परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी रॅपिट अॅक्शन फोर्स(आरएएफ) व केंद्रीय राखीव पोलीस दल(सीआरपीएफ) तैनात करण्यात आले आहे.(Himanta Biswa Sarma)
(हेही वाचा मुंबई पोलिसांच्या सर्तकतेमुळे Bangladeshi Infiltration नी मार्ग बदलला ! आता ‘या’ मार्गे होतेय घुसखोरी )
दरम्यान, बांगलादेशच्य सीमेला लागून असलेल्या मुस्लिमबहुल धुबरी शहरात अलीकडेच एका गटाने वादग्रस्त पोस्टर लावले होते. धार्मिक स्थळांजवळ गोमांसाचे तुकडे फेकण्यात आल्यानंतर स्थानिक परिसरातील वातावरण तापल्याचे पाहायला मिळाले. विशेष म्हणजे, आसामच्या धुबरी जिल्ह्यात वाढत्या धार्मिक तणावाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री सरमा(Himanta Biswa Sarma) यांनी राज्यातील पोलीस प्रशासनाला महत्त्वपूर्ण निर्देश दिले आहेत.
(हेही वाचा Israel-Iran War : इराणवरील हल्ल्यानंतर इस्रायलचे पंतप्रधान नेतान्याहू यांनी पंतप्रधान मोदींना केला फोन ! )
माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार, बकरी ईदच्या दुसऱ्याच दिवशी हनुमान मंदिराच्या परिसरात गोमांस फेकल्यानंतर तणाव वाढला. रात्रीच्या सुमारास परिसरात दगडफेकीच्या घटनाही घडल्याचे समोर आले. राज्याच्या मुख्यमंत्र्यां(Himanta Biswa Sarma)नी या संपूर्ण प्रकारास धार्मिक शांतता बिघडविण्याचे षडयंत्र म्हटले आहे. तसेच, पुढील वर्षी बकरी ईदला धुबरी येथे गरज पडल्यास हनुमान मंदिराचे रक्षण देखील करतील. तसेच, जो कुणी धार्मिक स्थळांचे नुकसान करेल किंवा वातावरण बिघडविण्याचा प्रयत्न करेल त्यांना ताबडतोब गोळ्या घातल्या जातील, असे स्पष्ट निर्देश मुख्यमंत्री सरमा यांनी दिले.
धुबरी जिल्ह्यातच का हिंसाचार घडला?
धुबरी जिल्हा हा आसाममधील मुस्लिमबहुल भाग आहे. जिल्ह्यात सुमारे ९० टक्के लोकसंख्या मुस्लिम आहे. बांगलादेशच्या सीमेला लागून असल्याने जिल्ह्यात बऱ्याच काळापासून बेकायदेशीर घुसखोरी, ओळख व राजकीय वादांचे केंद्र राहिला आहे. त्यानंतर आता मुख्यमंत्री सरमा(Himanta Biswa Sarma) यांनी सर्व समुदायांना शांतता राखण्याचे आवाहन केले. ते म्हणाले, जो कुणी धार्मिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करेल, त्याला सोडले जाणार नाही. कायदा व सुव्यवस्था राखणे राज्य सरकारची प्राथमिकता असल्याचे मुख्यमंत्री सरमा यांनी सांगितले.(Himanta Biswa Sarma)