Eknath Shinde : सुडाचे राजकारण करणारा नेता असतो का? असा सवाल करत शिंदेंनी ठाकरेंवर साधला निशाणा

तुम्ही महाराष्ट्राच्या जनतेला आणि मोदी साहेबांना दोन वेळा फसवलं आहे. मग तुम्ही आमच्यावर का आरोप करताय, अशी टीकाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर कोल्हापूर येथील अधिवेशनात केली आहे.

164
Eknath Shinde: अवकाळी पाऊस आणि गारपीटग्रस्त भागाला तातडीने मदत करा - मुख्यमंत्र्यांचे निर्देश

आता माझे २४ तास कधी संपतात हे मला कळतच नाही. अख्खा महाराष्ट्र आणि शिवसेना माझा परिवार आहे. माझं कुटुंब माझा परिवार इतकंच मी राहत नाही. लोकांकडून मला ऊर्जा मिळते. गर्दी हेच माझं टॉनिक आहे, असे एकनाथ शिंदे (Eknath Shinde) कोल्हापूर येथील महाअधिवेशनात म्हटले आहे.

कोल्हापुरात शनिवारी शिवसेनेच्या राज्यव्यापी अधिवेशनाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी एकनाथ शिंदे बोलत होते. यावेळी उद्धव ठाकरेंवर त्यांनी जोरदार हल्लाबोल केला.  ते म्हणाले की, काही लोकांना आयत्या पीठावरदेखील नीट रेगोट्या मारता आल्या नाहीत. मनोहर जोशी मुख्यमंत्री असताना त्यांना भर व्यासपीठावरून खाली उतरवण्यात कोणाचे कारस्थान आहे. मनोहर जोशी यांचे घर जाळण्यासाठी  माणसं पाठवण्यामागे कोणी कट रचला होता. दुसरी बाब म्हणजे, रामदास कदम यांनादेखील सांगितले होते की, तुम्ही शिवसेनेच्या कार्यक्रमासाठी षण्मुखानंद सभागृहात येऊ नका, कारण तुमचादेखील मनोहर पंत करण्याचा प्लॅन करण्यात आलेला आहे. हे सर्व गज्याभाऊ यांनादेखील माहित आहे. गजाजन किर्तीकर यांनादेखील अनेकदा माघारी पाठवले गेले. सुडाचे राजकारण केले जात होते, असा कोणी नेता असतो का? असा सवाल यावेळी शिंदेंनी करत ठाकरेंवर निशाणा साधला आहे.

(हेही वाचा – Liquor Policy Scam Case : मनीष सिसोदिया आणि संजय सिंह यांच्या न्यायालयीन कोठडीत २८ फेब्रुवारीपर्यंत वाढ)

तुम्ही महाराष्ट्राच्या जनतेला आणि मोदी साहेबांना दोन वेळा फसवलं आहे. मग तुम्ही आमच्यावर का आरोप करताय, अशी टीकाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर कोल्हापूर येथील अधिवेशनात केली आहे.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.