Eknath Shinde : शिवसेनेच्या वर्धापनदिनानिमित्त पक्षाला संबोधित करताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे(Eknath Shinde) यांनी उद्धव ठाकरेंवर टीकेची झोड उठविली. भर सभेत उपमुख्यमंत्री शिंदे(Eknath Shinde) यांनी उद्धव ठाकरेंचा समाचार घेताना म्हटले की, ते सत्तेसाठी अगतिक, लाचार झाल्याचे सांगत जोरदार हल्लाबोल केला. या भाषणादरम्यान, एकनाथ शिंदे(Eknath Shinde) यांनी उद्धव ठाकरेंना सवाल विचारला. ते म्हणाले, तुम्ही सांगता हिंदुत्व सोडलं नाही, असे म्हणता तर मग बाळासाहेब ठाकरे यांनी हिंदुहृदयसम्राट म्हणताना जीभ का कचरते, असा सवालही त्यांनी उपस्थित केला.(Eknath Shinde)
(हेही वाचा वर्धापनदिनीच मनसेसोबतच्या युतीचे संकेत; Uddhav Thackeray म्हणाले, राज्याच्या मनात… )
दरम्यान, हिंदू धर्माला शिव्या देणाऱ्यांच्या, स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा अपमान करणाऱ्यांच्या मांडीला मांडी लावून का बसता?, असा सवाल विचारतानाच उद्धव ठाकरे हे सत्तेसाठी लाचार झाले. त्यांनी हिंदुत्त्व बाजूला सोडून दिल्याचेही ते यावेळी म्हणाले. एकनाथ शिंदे(Eknath Shinde) यांनी उद्धव ठाकरेंचे नाव न घेता जोरदार समाचार घेतला. महाराष्ट्रातील जनतेशी प्रतारणा केली. मतदारांना धोका दिला. आता निवडणुकीचं वारं दिसत असताना त्यांना पुन्हा हिंदुत्त्व, मराठी माणूस आठवत आहे, अशी घणाघाती टीका शिंदेंनी यावेळी केली.
(हेही वाचा BMC : मुंबई महापालिकेला आता राखीव साठ्यातून उचलावे लागणार नाही पाणी; काय आहे कारण? )
२०१९ साली मराठी माणसांचा विश्वासघात केल्याचे सांगतानाच महाराष्ट्राचा विश्वासघात केला. सरडाही रंग बदलतो. पण इतक्या वेगाने रंग बदलणारा सरडादेखील महाराष्ट्राने पाहिला. त्यांचेच सगेसोयरे, भाऊबंद हे सांगत आहेत, अशा शब्दांत ठाकरेंचा समाचार घेतला. ते पुढे म्हणाले, २०२४च्या निवडणुकीत ठाकरे गटाचा स्ट्राईक रेट फक्त २३ टक्के होता. त्यामुळे मतदारांनी उबाठा गटाला केव्हाच टाटा-बाय-बाय केल्याचेही शिंदे(Eknath Shinde) यावेळी म्हणाले. आपल्याकडे आत्मविश्वास आहे. त्यांच्याकडे अहंकार आहे. हा अहंकार त्यांना विनाशाकडे नेतोय, अशी जहरी टीका ठाकरेंवर केली. बाळासाहेब ठाकरे यांनी ज्या काँग्रेसला आयुष्यभर विरोध केला. त्याच काँग्रेसच्या दावणीला बांधण्याचं पाप कोणी केलं हे आपल्याला माहिती असल्याचा पुनरुच्चार एकनाथ शिंदेंनी केला.(Eknath Shinde)
“मुंबई महाराष्ट्राचीच राहणार, कुणीही आलं तरी!”
“सात पिढ्या खाली आल्या तरी मुंबई महाराष्ट्रापासून कोणी तोडू शकत नाही,”अशी ठाम घोषणा उपमुख्यमंत्री शिंदे यांनी करत, मराठी अस्मितेच्या मुद्द्यावर आक्रमक भूमिका घेतली. मुंबईचा विकास खोळवणाऱ्यांचा आता ‘मुंबई लढा’ आठवतोय, असा उपरोधही त्यांनी केला.
“बाळासाहेब असते तर… मिरचीचा धूर दिला असता”
“बाळासाहेबांचा मेळावा विचारांचा होता, आणि यांचा मेळावा सत्तेसाठी लाचार झालेल्यांचा आहे,”असे सांगत त्यांनी उबाठाला खडे बोल सुनावले.”सरडाही रंग बदलतो, पण यांच्यासारखा लवकर नाही,”असे म्हणत त्यांनी सत्तेसाठी तत्त्वांशी प्रतारणा केल्याचा आरोप केला.
“मुंबईत खड्डे, डांबर आणि… तिजोरी लुटली, आता लढा आठवतो?”
शिंदे म्हणाले, “कोविड सेंटर, बॉडीबॅग, मिठी नदी गाळ, खड्डे आणि डांबर या प्रकरणांतून मुंबईकरांच्या आरोग्याशी खेळ झाला. तेव्हा महापालिकेची तिजोरी फोडली. आता सत्ता गेल्यावर ‘मुंबई लढा’ आठवत आहे,” असे म्हणत त्यांनी पूर्वीच्या सत्ताधाऱ्यांच्या कारभारावर थेट प्रहार केला.
“चौकशी सुरू आहे… तोंड उघडलं तर अनेकांचा ‘मोरया'”
“मिठी नदीच्या मगरमिठीतून कोणी सुटणार नाही. एकाची चौकशी सुरू आहे. त्याने तोंड उघडले, तर अनेकांचा ‘मोरया’ होईल,” असा इशाराही उपमुख्यमंत्र्यांनी दिला.
“देशहितासाठी परदेश दौऱ्यावर गेलेल्या खासदारांचे कौतुक”
‘ऑपरेशन सिंदूर’ संदर्भात भारताची भूमिका स्पष्ट करण्यासाठी परदेश दौऱ्यावर गेलेल्या खासदार डॉ. श्रीकांत शिंदे व मिलिंद देवरा यांच्या कार्याचे उपमुख्यमंत्र्यांनी कौतुक केले.“पाकिस्तानची चरबी उतरवणाऱ्या भारतीय लष्कराची शौर्यगाथा काही जण दुर्लक्षित करून पाकिस्तानची भाषा बोलतात,”अशी सडकून टीका करत, अशा लोकांना “निशाण-ए-पाकिस्तान” द्यायला हवे, असा टोलाही त्यांनी लगावला.
“महापालिका निवडणुकीत महायुतीचा भगवा फडकेल”
मुंबईतील उबाठाचे ५० नगरसेवक आणि इतर पक्षातील ६५ नगरसेवक शिवसेनेत प्रवेश करत असल्याचे सांगून, “या निवडणुका महायुती म्हणून लढायच्या आहेत. शिवसेनेचा भगवा महापालिकेपासून ग्रामपंचायतीपर्यंत फडकेल,” असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
‘लाडकी सून अभियान’ जाहीर; महिला मतदारांवर लक्ष
राज्यात शिवसेना ‘लाडकी सून’ अभियान राबवणार असून, याच्या माध्यमातून महिला मतदारांशी थेट संवाद साधण्यात येणार असल्याचीही घोषणा उपमुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी केली.
निवडणुकीपूर्वी भाजप-शिवसेना शिंदे गटाकडून आक्रमक रणनीतीचा आरंभ झाला आहे. मुंबई महापालिकेच्या ताब्यासाठी सुरू झालेला हा सत्तासंग्राम, राज्याच्या राजकारणात नव्या समीकरणांना जन्म देईल, असे संकेत वर्धापनदिनाच्या या सभेतून स्पष्ट झाले.
Join Our WhatsApp Community