Durgadi Fort: दुर्गाडी किल्ल्याची संरक्षण भिंत कोसळली; शिवप्रेमींमध्ये नाराजी

106
ऐतिहासिक किल्ल्याचा इतिहास लाभलेल्या कल्याणच्या दुर्गाडी किल्ल्याची नव्याने बांधलेली संरक्षण भिंत बुधवारी पहाटे चार वाजता कोसळली. पहिल्याच पावसात किल्ल्याची भिंत कोसळल्याने दुर्गाडीच्या सुशोभीकरण, मजबुतीकरणाचे सुरू असलेले काम निकृष्ट दर्जाचे आहे, हे उघड झाले आहे. संरक्षित भिंत कोसळ्यामुळे अनेक शिवप्रेमी नाराज झाले आहेत. या घटनेमुळे शिवसेना (Shivsena) आणि उबाठा पक्ष आक्रमक होत प्रशासनाला धारेवर धरले आहे. (Durgadi Fort)

कंत्राटदाराचे काम योग्य नाही
शिवसेनेचे आमदार विश्वनाथ भोईर यांनी घटनेची माहिती मिळताच, किल्ले दुर्गाडी येथे धाव घेतली. पाहणीनंतर आमदार भोईर यांनी सांगितले की, किल्ले दुर्गाडी हा आस्थेचा विषय आहे. दुर्गाडीच्या कामासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या प्रयत्नातून प्रत्येकी पाच कोटी याप्रमाणे १० कोटींचा निधी मंजूर करण्यात आले होते. तसेच आताचा पटेल नावाचा कंत्राटदार याेग्य काम करीत नसल्याचे उघड झाले आहे, असे भोईर म्हणाले.
(हेही वाचा – मुंबई ते नागपूर प्रवास आता सुस्साट! मुख्यमंत्र्यांच्या हस्ते Samruddhi Highway च्या शेवटच्या टप्प्याचे लोकार्पण संपन्न)

दरम्यान, या संरक्षण भिंतीचे काम करणारे कंत्राटदार जितेश पटेल (Contractor Jitesh Patel) यांनी एका इंग्रजी वृत्तपत्राशी बोलताना सांगितले की, “अलीकडेच, आम्ही या भिंतीचे काम पूर्ण केले आहे आणि भिंतीच्या वर माती असलेल्या ठिकाणी भरणीचे काम अद्याप झालेले नाही. आतापर्यंत, यावेळी पाऊस लवकर सुरू झाला, ज्यामुळे भिंतीच्या वरच्या भागात पाणी साचले, ज्याच्या दाबामुळे संरक्षणासाठी बांधलेली भिंत खाली पडली. तसेच पुढे पटेल म्हणाले की, “आता आम्ही पावसाळ्यात सुरक्षा उपाययोजना करून ही भिंत पुन्हा सुरक्षितपणे बांधू. असे विधान केले.
हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.