
धारावीची (Eknath Shinde) ओळख आता बदलणार! आशियातील सर्वात मोठी झोपडपट्टी म्हणून ओळखली जाणारी धारावी, लवकरच मुंबईतील सर्वात सुनियोजित पुनर्वसित शहर म्हणून नावारूपाला येणार आहे. हा फक्त विकास नव्हे, तर धारावीकरांच्या जीवनशैलीतील ऐतिहासिक परिवर्तन असणार आहे, असे मत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना व्यक्त केले.
₹९५,७९० कोटींचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प
काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली सह्याद्री अतिथिगृहात धारावी पुनर्विकासाचा आढावा घेण्यात आला. त्या बैठकीनंतर शिंदे म्हणाले, “धारावीचा पुनर्विकास हे आमचं सामाजिक वचन आहे. हे केवळ घरे बांधण्याचे काम नाही, तर रोजगार, शिक्षण, आरोग्य व सामाजिक सलोखा निर्माण करणारा हा प्रकल्प ‘स्मार्ट मुंबई’च्या दिशेने एक ऐतिहासिक टप्पा आहे.” (Eknath Shinde)
राज्य सरकारचा २०% आणि अदानी समूहाचा ८०% हिस्सा
७२,००० युनिट्सचे पुनर्वसन — यामध्ये ४९,८३२ निवासी, १२,४५८ व्यावसायिक युनिट्स
६ लाखांहून अधिक संभाव्य लाभार्थी
मुलभूत सुविधा आणि स्मार्ट प्लॅनिंग
धारावीतील एकूण २५३ हेक्टरपैकी १७४ हेक्टर क्षेत्रफळ पुनर्विकासासाठी वापरण्यात येणार आहे. डिजिटल ट्विन टेक्नॉलॉजी, टेनेट मॅनेजमेंट सिस्टीम, ड्रोन आणि लिडार सर्व्हेद्वारे अचूक आणि पारदर्शक काम सुरू आहे. (Eknath Shinde)
७९,४५५ घरांचे सर्वेक्षण पूर्ण
३८,००० चौ.मी.हून अधिक जागेत शाळा, आरोग्य केंद्र, पोलीस चौक्या, बाजारपेठा, ग्रंथालयं यांचा समावेश
१०८.९९ हेक्टर जमिनीचा स्मार्ट विकास
मल्टी-मोडल ट्रान्सिट हब व मेट्रो लाईन ११ ची थेट जोडणी
सर्व धर्मांना समवेत घेणारा विकास
धारावीतील २९६ धार्मिक स्थळांचा पुनर्विकास कायद्याच्या चौकटीत व सल्ल्यानुसार केला जाणार आहे. यासाठी माजी मुख्य न्यायमूर्तींच्या अध्यक्षतेखाली विशेष समिती गठित करण्यात आली आहे. (Eknath Shinde)
“केवळ घर नाही, नव्या जीवनशैलीचं स्वप्न पूर्ण करणार” – शिंदे
“धारावीकरांना हक्काचं घर देण्याबरोबरच त्यांना नव्या जीवनशैलीत सामावून घेणं हे आमचं ध्येय आहे. हे स्वप्न नाही, तर आमचं सामाजिक वचन आहे,” असं सांगत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी धारावी पुनर्विकासाबाबतची शासनाची कटिबद्धता पुन्हा एकदा अधोरेखित केली. (Eknath Shinde)