
-
प्रतिनिधी
राज्यातील राजकारणात शिवसेना आणि मनसे यांच्यात युती होणार का, या चर्चांना पुन्हा एकदा चालना मिळाली आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (DCM Eknath Shinde) लवकरच मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना स्नेहभोजनासाठी त्यांच्या निवासस्थानी आमंत्रित करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. या भेटीमुळे दोन्ही पक्षांमध्ये जवळीक निर्माण होण्याची शक्यता राजकीय वर्तुळात व्यक्त केली जात आहे. विशेष म्हणजे या स्नेहभोजन आयोजनाची पूर्ण जबाबदारी मंत्री उदय सामंत यांच्याकडे देण्यात आली आहे, अशी माहितीही मिळत आहे.
युतीसंदर्भातील हालचालींना वेग
सूत्रांच्या मते, उपमुख्यमंत्री शिंदे (DCM Eknath Shinde) यांनी स्वतः पुढाकार घेऊन राज ठाकरेंना सोबत घेण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुका, तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ही जवळीक राजकीयदृष्ट्या महत्त्वाची ठरू शकते.
(हेही वाचा – Flight Cancellations : दोन विमानांचे आपत्कालीन लँडिंग ! कारण आलं समोर …)
विरोधी सूर आणि सावध भूमिका
या चर्चांवर मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी प्रतिक्रिया देताना स्पष्टपणे म्हटले की, “कोणी घरी जेवायला गेले म्हणून युती होते असं नसतं. पक्षाची आयडॉलॉजी हा देखील महत्त्वाचा भाग असतो.” तसेच, यावर शिवसेना उबाठा नेत्या व माजी महापौर किशोरी पेडणेकर यांनी मिश्कील प्रतिक्रिया दिली. “स्नेहभोजनाला जायचं की नाही हे राज ठाकरेंनीच ठरवावं, आम्ही काय बोलणार?”
युती की केवळ सौजन्यभेट?
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (DCM Eknath Shinde) – राज ठाकरे भेट घडल्यास, ती केवळ सौजन्यभेट असेल की आगामी निवडणुकांसाठी युतीचा प्रारंभ, याबाबत चर्चेला वेग आला आहे. भाजपा, शिवसेना आणि मनसे यांच्यातील त्रिसंघ तयार होणार का? याबाबतही चर्चेला तोंड फुटले आहे. सध्या ही भेट औपचारिक आहे की राजकीय रणनीतीचा भाग, याबाबत साशंकता कायम असली तरीही मुंबईतील राजकारणात हलकेच खळबळ निर्माण झाली आहे. पुढील काही दिवसांत या भेटीचा खरा अर्थ स्पष्ट होण्याची शक्यता आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community