-
प्रतिनिधी
मुंबईतील रस्त्यांचे काँक्रिटीकरण वेगाने सुरू असून, पुढील दोन वर्षांत मुंबई खड्डेमुक्त होईल, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (DCM Eknath Shinde) यांनी दिली. एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी महाराष्ट्र आणि मुंबईतील विकासकामांवर सविस्तर भाष्य करताना, “दरवर्षी डांबरातून काळ्याचे पांढरे करणे बंद झाल्याने शिवसेना उबाठाची बोंबाबोंब सुरू आहे,” असा टोला महाविकास आघाडीला लगावला.
उपमुख्यमंत्री शिंदे (DCM Eknath Shinde) म्हणाले, “महापालिका प्रशासक भूषण गगराणी यांच्यासह मुंबईतील रस्त्यांच्या काँक्रिटीकरणाचा आढावा घेतला. ७०० किमी रस्त्यांचे काँक्रिटीकरण ठरले असून, सध्या ४०० किमी रस्त्यांचे काम सुरू आहे. ३१ मेपर्यंत शक्य तेवढे काम पूर्ण करून, पावसाळ्यापूर्वी खोदकाम थांबवून पॅचवर्क केले जाईल. यामुळे पावसाळ्यात नागरिकांची गैरसोय होणार नाही. त्यानंतर उर्वरित ३०० किमी रस्त्यांचे काम हाती घेतले जाईल.” त्यांनी पुढील दोन वर्षांत मुंबई खड्डेमुक्त होण्याचा विश्वास व्यक्त केला.
(हेही वाचा – लखनऊमध्ये Train उलटवण्याचा कट; आठवड्यात घडली दुसरी घटना)
महायुती सरकारच्या कामगिरीवर प्रकाश टाकताना उपमुख्यमंत्री शिंदे (DCM Eknath Shinde) म्हणाले, “अडीच वर्षांपूर्वी महायुती सत्तेवर आली तेव्हा महाविकास आघाडीने स्थगित केलेल्या प्रकल्पांना चालना दिली. मुंबईत ३७० किमी मेट्रो साकारली जात आहे, जी पुढील २-३ वर्षांत टप्प्याटप्प्याने कार्यान्वित होईल. यामुळे वाहतूक कोंडी संपेल. आरे कारशेडचा निर्णय घेतला नसता, तर त्या प्रकल्पाची किंमत १० हजार कोटींनी वाढली असती आणि तो १० वर्षे पूर्ण झाला नसता.”
उपमुख्यमंत्री शिंदे (DCM Eknath Shinde) यांनी राज्यातील पायाभूत प्रकल्पांचाही आढावा घेतला. “समृद्धी महामार्ग, अटल सेतू, कोस्टल रोड, मेट्रो, वाढवण बंदर आणि नवी मुंबई विमानतळ हे मुंबई आणि MMR साठी गेमचेंजर ठरतील. राज्यात ८-१० लाख कोटींचे पायाभूत प्रकल्प प्रगतीपथावर आहेत,” असे त्यांनी सांगितले. तसेच, “लाडकी बहीण योजनेसारख्या योजनांमुळे आर्थिक शिस्त बिघडू दिली नाही. परदेशी गुंतवणूक, जीडीपी, निर्यात, स्टार्टअप्समध्ये महाराष्ट्र अव्वल आहे. अडीच वर्षांत ८ लाख कोटींचे, तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी १५ लाख कोटींचे गुंतवणूक करार केले, त्यापैकी ७०-८०% प्रत्यक्षात आले आहेत,” असेही ते म्हणाले. या मुलाखतीत उपमुख्यमंत्री शिंदे यांनी महायुतीच्या विकासकामांना विरोधकांकडून होणाऱ्या टीकेवरही प्रत्युत्तर दिले. “आम्ही विकासावर लक्ष केंद्रित केले आहे, तर विरोधक फक्त बोंब मारत आहेत,” असे त्यांनी ठणकावले.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community