भारत आणि बांगलादेश सीमेवर कुकी-चिन-मिझो (Kuki) या समुदायांच्या लोकांनी या भागात जोरदार निदर्शने सुरु केली आहेत. या समुदायाला आता इथे स्वतःचा स्वतंत्र देश हवा आहे. हा समुदाय ख्रिस्ती असून त्यांना ख्रिस्ती देशाची निर्मिती करायची आहे, यासाठी पाश्चात्त्य देश यासाठी पाठिंबा देत आहे. बांगलादेशाच्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांनीही याआधी याची पुष्टी केली होती. नेपाळ स्थित माध्यमांनीही या वृत्ताला दुजोरा दिला आहे.
भारत, म्यानमार आणि बांगलादेश तोडण्याचे कारस्थान
या समुदायाला या प्रदेशात पूर्व तिमोरसारखा ख्रिस्ती देश स्थापन करायचा आहे. ज्यात बांगलादेश, म्यानमार आणि मिझोरमच्या क्षेत्रांचा समावेश असलेले हे एक स्वतंत्र ‘झो’ राज्य असेल. त्यामध्ये कुकी-चिन-मिझो (Kuki) लोकांची वस्ती आहे. यासाठी पाश्चात्य शक्ती प्रोत्साहन देत आहे. पूर्व तिमोरप्रमाणे, ते बांगलादेश आणि म्यानमारचे काही भाग घेऊन बंगालच्या उपसागरात एक ख्रिश्चन देशाचा तळ उभा करण्याच्या तयारीत आहेत. ख्रिश्चन देश निर्माण करण्याच्या या प्रयत्नात ईशान्य भारताचा काही भाग देखील समाविष्ट आहे. कुकी-चिन-मिझो (Kuki) लोकांनी अलिकडच्या काळात स्वतःला ‘झो’ लोक म्हणून संबोधण्यास सुरुवात केली आहे. ते ‘झोगम’ किंवा झो लोकांसाठी एक स्वतंत्र देश असावा अशी आकांक्षा बाळगत आहेत, ज्यामध्ये म्यानमारच्या चिन राज्याचा मोठा भाग, भारताच्या मिझोरम आणि मणिपूरचे कुकी-वस्ती (Kuki) असलेले क्षेत्र आणि बांगलादेशच्या चितगाव विभागातील बंदरबन जिल्हा आणि लगतचे भाग समाविष्ट आहेत.
(हेही वाचा पश्चिम रेल्वेवर शनिवारपासून 36 तासांचा Mega Block; 162 लोकल गाड्या रद्द, प्रवाशांना मोठा फटका)
अतिरेकी संघटना सक्रिय
या उद्देशासाठी इथे विविध अतिरेकी संघटना कार्यरत आहेत. चिनलँड जॉइंट डिफेन्स कमिटी – चिन नॅशनल आर्मी (सीएनए), चिनलँड डिफेन्स फोर्स (सीडीएफ) आणि चिन नॅशनल डिफेन्स फोर्स (सीएनडीएफ) यांनी स्थापन केलेली संयुक्त संस्था म्यानमारमध्ये सशस्त्र संघर्ष करत आहे. बांगलादेशच्या बंदरबन जिल्हा आणि चितगाव विभागाच्या आसपासच्या भागात, कुकी-चिन नॅशनल फ्रंट (केएनएफ) ने अलिकडच्या काळात दहशतवादी कृत्ये केली आहेत. कुकी नॅशनल आर्मी (केएनए), कुकी नॅशनल फ्रंट (केएनएफ) आणि कुकी लिबरेशन आर्मी (केएलए) च्या बॅनरखाली कुकी (Kuki) अतिरेकी मणिपूरमध्ये हत्या, अपहरण आणि खंडणीखोरी करत आहेत. जवळजवळ सर्व ‘झो’ लोक – कुकी, चिन आणि मिझो, जे समान वांशिकतेचा भाग असल्याचा दावा करतात, ते स्वतःला ख्रिश्चन समजत आहेत. ब्रिटीश राजवटीत ख्रिश्चन मिशनऱ्यांनी त्यांना आकर्षित करून धर्मांतर करण्यास सुरुवात केली आहे, ब्रिटीश भारत सोडून गेल्यानंतर त्यांनी हे धर्मांतराचे सत्र सुरु केले असल्याचे म्हटले आहे.
Join Our WhatsApp Community