Congress BJP Poster War: काँग्रेसच्या ‘त्या’ पोस्टरवर भाजपाचा पलटवार; म्हणाले, काँग्रेस लष्कर-ए-पाकिस्तान…

178
Congress BJP Poster War : जम्मू काश्मीरच्या (Jammu and Kashmir) पहलगाम मध्ये २२ एप्रिलला दहशतवादी हल्ला झाला होता. याच पहलगाम दहशतवादी हल्ल्यावरून काँग्रेस पक्षाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नाव न घेता त्यांच्यावर निशाणा साधला आहे. काँग्रेसच्या अधिकृत एक्स हँडलवर एक फोटो पोस्ट केला आहे. ज्यामध्ये कुर्ता-पायजमा घातलेल्या एका माणसाचे डोके गायब आहे आणि त्याचे हात आणि पाय गायब आहेत. त्याच्या कॅप्शनमध्ये लिहिले होते – जबाबदारीच्या वेळी गायब (बेपत्ता). अशा आशयाची काँग्रेसने पोस्ट केली आहे. (Congress BJP Poster War)</
(हेही वाचा – Pakistan Poverty News : पाकिस्तानमध्ये सुमारे १ कोटी लोक उपासमारीच्या वाटेवर)
दरम्यान, पहलगाममध्ये झालेल्या आतंकवादी हल्ल्यात निष्पाप २६ जणांचा गोळ्या घालून हत्या करण्यात आली. या हल्ल्याच्या दोन दिवसांनंतर २४ एप्रिल रोजी सर्वपक्षीय नेत्यांची बैठक झाली. या बैठकीला पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित नव्हते. संबंधित पोस्ट ही याच आशयाशी संबंधित आहे. या सर्वपक्षीय बैठकीत पंतप्रधानांनीही सहभागी व्हावे, अशी मागणी काँग्रेसने केली होती. यावेळी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक पार पडली.

यावर भाजपा प्रवक्ते गौरव भाटिया म्हणाले की, काँग्रेस आणि दहशतवाद्यांचे विचार एकसारखेच आहेत. काँग्रेस म्हणजे लष्कर-ए-पाकिस्तान. पाकिस्तानच्या टॉवरवरून काँग्रेसला सिग्नल मिळतो. हे राहुलच्या इशाऱ्यावर घडत आहे. पाकिस्तानमध्ये कौतुक मिळवण्यासाठी काँग्रेस (BJP Congress Controversy) हे करत आहे.
(हेही वाचा – Reserve Bank Gold Stock : रिझर्व्ह बँकेनं खरेदी केलं ५७.५ टन सोनं; मध्यवर्ती बँक इतकं सोने खरेदी का करत आहे?)
मालवीय म्हणाले- प्रत्यक्षात काँग्रेसची मान कापली गेली 
काँग्रेसच्या पोस्टवर भाजपा नेते अमित मालवीय म्हणाले- ‘सर तन से जुदा’ सारखी भाषा वापरून काँग्रेसने पुन्हा एकदा सिद्ध केले आहे. की ही टिप्पणी मुस्लिम व्होट बँकेला लक्षात घेऊन करण्यात आली आहे. मालवीय म्हणाले, की जर आपण याकडे एक म्हण म्हणून पाहिले तर प्रत्यक्षात काँग्रेसची मान कापली जाते. काँग्रेस आता दिशाहीन अनियंत्रित संघटना बनली आहे.

(हेही वाचा – Pahalgam Terror Attack : कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांकडून पीडितांची थट्टा; म्हणे, दहशतवाद्यांकडे एवढा वेळ नसतो)

अनुराग ठाकूर म्हणाले- काँग्रेस भारतासोबत आहे की पाकिस्तानसोबत?
भाजपा खासदार म्हणाले की, काँग्रेस आणि त्यांच्या नेत्यांना पाकिस्तानच्या बाजूने बोलण्याची काय सक्ती आहे? ते पाकिस्तानला का पाठिंबा देत आहेत? भारतीयांचे रक्त सांडत असल्याचे पाहून त्यांना राग येत नाही का? काँग्रेस कोणाच्या बाजूने उभी आहे, भारत की पाकिस्तान? असा सवाल देखील अनुराग ठाकूर यांनी उपस्थित केला.

राहुल गांधी काय म्हणाले? 
राहुल गांधी म्हणाले की, २२ एप्रिल रोजी जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याने संपूर्ण देशाला हादरवून टाकले आहे. अशा वेळी भारताने एकत्र येऊन जगाला संदेश दिला पाहिजे की, आपण नेहमीच दहशतवादाविरुद्ध एकत्र उभे आहोत.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.