CM Devendra Fadnavis : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस(CM Devendra Fadnavis) यांनी काँग्रेस नेते तथा विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांना चोख प्रत्युत्तर दिले आहे. राहुल गांधी यांनी ‘मॅच फिक्सिंग महाराष्ट्र’ या लेखाच्या माध्यमातून महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचे निकाल निराशाजनक व अनधिकृत स्त्रोतांवर आधारित असल्याची टिप्पणी केली होती. यावर आता देवेंद्र फडणवीसां(CM Devendra Fadnavis)नी ‘जनतेने ज्यांना नाकारले, ते जनादेशाला नाकारतात!’ या लेखाच्या माध्यमातून चोख प्रत्युत्तर देत विधानसभा निवडणुकीची इत्थंभूत माहिती दिली आहे.(CM Devendra Fadnavis)
(हेही वाचा महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीबाबत Rahul Gandhi यांचा अपप्रचार; भाजपाने केला पलटवार, म्हणाले… )
देवेंद्र फडणवीसांनी पुराव्यांसह सर्व आरोप खोडून काढले आहेत. विशेष म्हणजे राहुल गांधी यांनी ज्या वृत्तपत्रात लेख लिहिला होता, त्याच वृत्तपत्रात देवेंद्र फडणवीसांनी लेख लिहित सडेतोड उत्तर दिले आहे. देवेंद्र फडणवीसांनी निवडणूक आयोगाच्या स्थापनेपासूनचा इतिहास लेखात मांडला. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतील मतदारवाढ, अधिक मतदान यावर सविस्तर भाष्य केले आहे. राहुल गांधींच्या आक्षेपांना फडणवीसां(CM Devendra Fadnavis)नी मुद्देसूद उत्तर दिले आहे.
देवेंद्र फडणवीसां(CM Devendra Fadnavis)नी लेखात काय म्हटले?
विरोधी पक्षनेते राहुल गांधींना सल्ला देत म्हणाले, एकदा पराभव स्वीकारुन आपण कुठे चुकतो आहोत, जनतेशी आपला कनेक्ट कुठे कमी पडतो, त्यासाठी काय केले पाहिजे, याचा विचार केला तर ते अधिक संयुक्तिक ठरेल. तसेच, भारत जोडोच्या नावाखाली चालविलेल्या भारत तोडो अभियानात डॉ. मनमोहन सिंह यांनी नक्षली ठरविलेल्या किती संघटना होत्या, याचे स्मरण राहुल गांधींना करून दिले आहे. महाराष्ट्र विधीमंडळातील दि. १९ डिसेंबर २०२४ दिवशी केलेल्या भाषणाची आठवणही त्यांनी करून दिली.
ते पुढे म्हणाले, बिहारसह आगामी विधानसभा निवडणुकांच्या पराभवाची कारणेही त्यांना आतापासून तयार करायची आहेत, असा सणसणीत टोला फडणवीसांनी लगावला. तसेच, निवडणूक आयोगाने २४ डिसेंबर २०२४ रोजी आपल्या पक्षाच्या विधी, मानवाधिकार आणि आरटीआय विभागाचे वकील ओमर हूडा यांना सविस्तर ६० पानांचे पत्र पाठविले आहे. त्यात सर्व प्रश्नांचे निराकरण करण्यात आले असून ते एकदा आवर्जून वाचावे, असे आवाहन त्यांनी केले. मतदारवाढीसंदर्भात मुख्यमंत्री फडणवीसां(CM Devendra Fadnavis)नी २०१४ ते २०२४ या कालावधीतील वाढलेली मतदार संख्यांचे तपशीलही फडणवीसांनी दिले.
राहुल गांधी यांचा अर्थहीन मुद्दा
विरोधी पक्षनेते राहुल गांधी हे सातत्याने लोकशाही प्रक्रियेचा अपमान करतात, सातत्याने जनादेशाचा अपमान करतात. त्यामुळे जनतेने त्यांना नाकारल्यामुळे त्याचा बदला म्हणून ते जनतेला नाकारत आहेत. यातून काँग्रेस पक्ष आणखी गर्तेत जाणार आहे, असा शाब्दिक हल्लाबोल फडणवीसांनी केला. तसेच, त्यांच्याच पक्षाने आमदार सांगतात की, राहुल गांधी यांची एक दिवसांत भेट घेऊन दाखवा, अशी विधाने का करतात?, यावर त्यांनी आत्मचिंतन करण्याची गरज असल्याचेही मुख्यमंत्री फडणवीसां(CM Devendra Fadnavis)नी म्हटले. सातत्याने लोकशाही प्रक्रियेवर आणि संवैधानिक संस्थांवर शंका उपस्थित करुन ते देशात कोणते विष कालवत आहेत, याचे भान त्यांनी ठेवले पाहिजे. महाराष्ट्रातील जनतेच्या या अपमानाचा, मुख्यमंत्री या नात्याने त्यांचा सेवक म्हणून मी याचा कायमच निषेधच करीन, अशा शब्दांत देवेंद्र फडणवीसांनी राहुल गांधींचा समाचार घेतला.(CM Devendra Fadnavis)
Join Our WhatsApp Community