भाडेवाढ न करता एसी ट्रेन वाढविण्याचा विचार; CM Devendra Fadnavis यांचे विधान

157
प्रतिनिधी 

मुंब्रा दुर्घटनेनंतर मी केंद्रिय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव (Ashwini Vaishnav) यांच्याशी दीर्घ चर्चा केली आहे. प्रवासी सुरक्षिततेसाठी लोकलला बंद होणारे दरवाजे लावण्याचा विचार सुरू आहे. सोबतच एसी ट्रेन वाढविण्यात येणार आहेत त्या देखील भाडेवाढ न करता यावर देखील विचार सुरू आहे. काल जे घडले त्यातून निश्चितच बोध घ्यावा लागेल. केंद्र आणि राज्य सरकार मिळून याबाबत योजना आखेल अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडावीस (CM Devendra Fadnavis) यांनी दिली. भारत निवडणूक आयोगाने याआधीच निवडणूकीसंदर्भात काँग्रेस पक्षाला माहिती अधिकार कायदयांतर्गत ६० पानी उत्तर दिले आहे. त्यात जर विसंगती असतील तर त्या राहुल गांधी यांनी दाखवून दयाव्यात असे माझे त्यांना आव्हान असल्याचेही फडणवीस म्हणाले. दोन राष्ट्रवादी एकत्र होणार की नाही हे तेच सांगू शकतात, त्यांच्या मनात काय चालले आहे. हे जाणून घेण्याची शक्ती माझ्याकडे नाही असेही ते म्हणाले. केंद्रातील मोदी सरकारच्या तिस-या पर्वाच्या वर्षपूर्तीच्या निमित्ताने आयोजित पत्रकारपरिषदेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोलत होते. (CM Devendra Fadnavis)

(हेही वाचा – भाडेवाढ न करता एसी ट्रेन वाढविण्याचा विचार; CM Devendra Fadnavis यांचे विधान)

तिकिट दरात वाढ न करता एसी ट्रेन
मेट्रो या अतिशय चांगल्या दर्जाच्या आहेत. मेट्रोत प्रवास करणा-यांना एसी प्रवास, लोकल ट्रेन (Mumbai Local Train) मध्ये प्रवास करणारा नागरिक दुययम नाही ना त्यालाही त्याच सुविधा मिळाव्यात  अशी आमची अपेक्षा आहे. अश्विनी वैष्णव यांच्याशी माझी चर्चा झाली आहे. तिकिट दर न वाढवता एसी लोकलचा प्रवास होईल यावर विचार सुरू असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.
गुदमरणार नाही असेच डिझाईन करू
मेट्रो नेटवर्क (Metro Network) पूर्ण न झाल्याने लोकलमध्ये गर्दी आहे. प्रवासी सुरक्षिततेसाठी दरवाजे लावण्याचा विचार करण्यात येत आहे. कोणी म्हणाले, दरवाजे लावले तर लोक गुदमरतील. इतके तर सरकारला कळते ना की गुदमरू नयेत असे डिझाईन करावे असे म्हणताना मुख्यमंत्री फडणवीस यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांचे नाव न घेता टोला लगावला.
राहुल गांधींना आव्हान

मतदानात घोळ झाला असे राहुल गांधींचे (Rahul Gandhi) म्हणणे असेल तर त्यांनी तसे भारत निवडणूक आयोगाला (Election Commission of India) पत्र दयावे. पण ते देणार नाहीत. कारण माहितीच्या अधिकारात त्यांनी आधीच ही माहिती घेतली आहे. आयोगाने त्यांना ६० पानी उत्तर दिले आहे. त्यात जर विसंगती असतील तर त्या राहुल गांधींनी दाखवून दयाव्यात असे आव्हान मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिले.

(हेही वाचा – ‘पाकिस्तानात दहशतवादी जितके आत असतील तितके आत घुसू’; परराष्ट्रमंत्री S Jaishankar यांचा स्पष्ट इशारा)

कोणाचाही बाप काढणे चुकीचेच
मंत्री नितेश राणे (Minister Nitesh Rane) यांनी एका भाषणात सगळयांचा बाप म्हणून भाजपाचा मुख्यमंत्री बसला आहे. हे लक्षात ठेवा असे वक्तव्य केले होते. याचे पडसाद महायुतीत उमटले. मंत्रिमंडळ बैठकीत शिवसेनेच्या मंत्र्यांनी हा विषय उपस्थित केला होता. त्यावर मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, कोणाचाही बाप काढणे चुकीचे आहे. मी देखील संबंधित मंत्र्यांशी चर्चा केली. माझ्या बोलण्याचा तो अर्थ नव्हता असे ते मला म्हणाले. पण राजकारणात अशा वक्तव्याचा वेगळया पदधतीने अर्थ घेतला जातो ते योग्य नाही. त्यामुळे अशा प्रकारे बोलणे योग्य नाही असे म्हणालो त्यांनीही ते मान्य केले असे फडणवीस म्हणाले.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.