राज्याचे मुख्यमंत्री तथा पालकमंत्री देवेंद्र फडणवीस हे ०६ या दिवशी गडचिरोलीचे दौऱ्यावर आहेत. यावेळी ते भामरागड तालुक्यातील छत्तीसगड सीमेवर असलेल्या कवंडे या गावात आले. कवंडे हे गाव माओवाद्यांचा बालेकिल्ला म्हणून ओळखले जातो. छत्तीसगड राज्यातून माओवादी याच गावातून महाराष्ट्रात प्रवेश करतात. नुकतेच गेल्या ९ मार्च रोजी गडचिरोली पोलिसांनी याठिकाणी नवीन पोलीस स्टेशन उभारले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत शुक्रवारी गडचिरोलीत १३ आत्मसमर्पित नक्षलवादी (Naxal) युवक-युवतींचा सामूदायिक विवाहसोहळा संपन्न झाला आहे. स्वत: देवेंद्र फडणवीस हे नवजोडप्यांना आशीर्वाद देण्यासाठी लग्नसोहळ्याला उपस्थित राहिले. तत्पूर्वी त्यांनी गडचिरोली जिल्ह्याच्या शेवटच्या टोकावर जाऊन पाहाणी केली. (CM Devendra Fadnavis)
(हेही वाचा – Vishalgad Fort : विशाळगडावर बकरी ईदच्या कुर्बानीला परवानगी देण्याच्या उच्च न्यायालयाच्या आदेशाला आव्हान; सर्वोच्च न्यायालय काय म्हणाले?)
गडचिरोलीत (Gadchiroli Maoists) माझ्या एवढा फिरलेला मुख्यमंत्री दुसरा कोणीच नाही, असे म्हणत मुख्यमंत्री फडणवीस यांनी गडचिरोली जिल्ह्यातील नक्षलवादी भागात आपण स्वत: शेवटच्या टोकापर्यंत दौरे केल्याचं मध्यामांशी बोलताना सांगितले. माओवाद्यांच्या भागात भेट देत येथील परिस्थितिचा आढावा घेतला. तसेच गडचिरोलीच्या शेवटच्या टप्यात १० ते १५ किलोमीटर अंतरावर नेलगुंडा, पेनगुंडा आणि कवंडे असे तीन पोलीस स्टेशन उभारून माओवाद्यांचा प्रवेश द्वार बंद केला आहे.
जल, जंगल आणि जमीन वाचवून विकास करायचा
माझ्या एवढं गडचिरोलीत फिरणारा दुसरा मुख्यमंत्री महाराष्ट्रात कोणीही नाही, या ठिकाणी विपरीत परिस्थितीत आपले सिक्युरिटी फॉर्सेस चांगलं काम करत आहेत. या सुरक्षा यंत्रणांचा मनोबल वाढवे म्हणून मी अशा आऊटपोस्टवर दुर्गम भागात जात असतो. लवकरच गडचिरोलीमधून माओवाद पूर्णपणे संपुष्टात आणू असा विश्वासही त्यांनी यावेळी बोलून दाखवला. आजवर गडचिरोलीचा विकास आणि विकासाची क्षमता नेत्यांच्या भाषणामध्ये असायची. मात्र, 2014 नंतर आम्ही प्रत्यक्ष आणि गडचिरोलीत बदल घडवून आणले. मात्र, गडचिरोलीत औद्योगिक विकास (Gadchiroli Industrial Development) करत असताना इथले जल, जंगल आणि जमीन वाचवून आपल्याला विकास करायचा आहे. गडचिरोलीचा नैसर्गिक स्वभाव आपण बदलणार नाही, असेही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यावेळी स्पष्ट केले.
(हेही वाचा – Indus Water Treaty : पाकिस्तानकडून भारताला पुन्हा अणुयुद्धाची धमकी)
पोलीस मुख्यालयात आत्मसमर्पित नक्षलवाद्यांचा लग्नसोहळा
गडचिरोली पोलीस दलातर्फे आत्मसमर्पित नक्षलवादी युवक युवतींचा सामूहिक विवाह सोहळा आयोजित केला असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत हा आगळावेगळा लग्नसोहळा संपन्न होत आहे. जवळपास १३ आत्मसमर्पित नक्षल युवक युवती या विवाह सोहळ्यातून लग्न बंधनात अडकणार आहेत. तत्पूर्वी गडचिरोली पोलीस दलाच्या बँड पथकाद्वारे पोलीस मुख्यालय परिसरातून वर-वधुंची वाजत जागत वरात काढण्यात आली. या वरातीत पोलीस कर्मचारी वऱ्हाडी बनवून सहभागी झाले होते. विवाह बंधनात अडकणाऱ्या मोस्ट वॉन्टेड नक्षली गिरीधरसह नक्षल युवक-युवतींनी या लग्न सोहळ्याबद्दल आनंद व्यक्त केला आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community