
महाराष्ट्रातील (CM Devendra Fadnavis) देशी गायींच्या संख्येत सातत्याने होणारी घट रोखण्यासाठी आणि त्यांच्या संवर्धनाला चालना देण्यासाठी राज्य शासनाने ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. डेन्मार्क आणि अमेरिकेतील विदेशी संकरित गायींच्या तुलनेत देशी गायींची उत्पादन आणि प्रजननक्षमता कमी होत गेली, परिणामी आपली ‘गोमाता’ उपेक्षित राहिली. ही परिस्थिती बदलण्यासाठी शासनाने दि. ३० सप्टेंबर २०२४ रोजी देशी गायींना ‘राज्यमाता’ म्हणून सन्मानित केले आणि आता दरवर्षी २२ जुलै हा ‘शुद्ध देशी गोवंश जतन आणि संवर्धन दिन’ अर्थात ‘गोमाता दिन’ म्हणून साजरा करण्याची अधिकृत अधिसूचना जारी केली आहे. (CM Devendra Fadnavis)
हेही वाचा-Ahmedabad Plane Crash : “पावर कमी येत आहे, वाचणार नाही…” ; पायलटचा शेवटचा संदेश मिळाला
२०१५ मध्ये महाराष्ट्रात गोमांस विक्री आणि साठवणुकीवर बंदी घालणारा कायदा लागू झाल्यापासून गो-तस्करीच्या घटनांमध्ये वाढ झाल्याचे दिसते. या कायद्यान्वये गाय, बैल आणि वासरांच्या कत्तलीवर बंदी आहे. गाय हा हिंदू अस्मितेचा, संस्कृतीचा आणि स्वाभिमानाचा केंद्रबिंदू आहे. आणि या विचारसरणीला शासनमान्यता मिळणे, ही हिंदू जनमानसासाठी अभिमानाची बाब आहे. (CM Devendra Fadnavis)
देशी गायी आणि त्यांच्या उत्पादनांचे महत्त्व जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी राज्यभरात चित्रपट, प्रदर्शने, शिबिरे आणि स्पर्धा यांसारखे उपक्रम आयोजित केले जातील. हे कार्यक्रम पशुसंवर्धन आयुक्त आणि महाराष्ट्र गोसेवा आयोग यांच्या संयुक्त विद्यमाने राबवले जाणार असून, त्यासाठी लागणारा खर्च गोसेवा आयोगाच्या निधीतून भागवला जाईल. ग्रामीण अर्थव्यवस्था आणि सांस्कृतिक वारसा जपण्याच्या दृष्टीने हा निर्णय महत्त्वाचा ठरणार आहे. यामुळे पशुपालकांना बाजारपेठ उपलब्ध होऊन शेती-संस्कृतीत गायींचे स्थान अधिक दृढ होईल, अशी अपेक्षा आहे. (CM Devendra Fadnavis)
हेही वाचा- Iran-Israel War : इराणवरील हवाई हल्ल्यांसंदर्भात पाकिस्तानी संसदेत अजब तर्कट; अध्यक्ष म्हणाले…
राज्यात मराठवाड्यात देवणी, लालकंधारी, पश्चिम महाराष्ट्रात खिल्लार, उत्तर महाराष्ट्रात डांगी आणि विदर्भात गवळाऊ अशा विविध देशी जातीच्या गायी आढळतात. मात्र, संकरित गायींच्या तुलनेत कमी उत्पादनक्षमता आणि प्रजननक्षमता यांमुळे देशी गायींची संख्या सातत्याने घटत आहे. यावर उपाय म्हणून उच्च वंशावळीच्या देशी गायी निर्माण करण्यासाठी त्यांची उत्पादनक्षमता आणि प्रजननक्षमता वाढवण्यावर भर देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. (CM Devendra Fadnavis)
हेही पहा-
Join Our WhatsApp Community