Chhagan Bhujbal : छगन भुजबळ यांचा गौप्यस्फोट; म्हणाले, १६ नोव्हेंबरलाच मंत्रीमंडळाचा राजीनामा दिला

185

राज्य सरकारने मराठा आंदोलकांच्या मागण्या मान्य केल्यानंतर मंत्री छगन भुजबळ आक्रमक झाले आहेत. त्यांनी आता आपल्याच सरकारला आव्हान देण्याची भाषा करताना मोठा गौप्यस्फोट केला. ३ फेब्रुवारी रोजी अहमदनगर येथे ओबीसी आरक्षण बचाव एल्गार मेळावा आयोजित केला. या मेळाव्यात बोलताना छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी राज्य सरकारविरोधात दंड थोपटले.

(हेही वाचा Imran Khan: बेकायदा निकाह प्रकरणी इम्रान खान आणि त्यांच्या पत्नीला ७ वर्षांचा कारावास, ५ दिवसांत तिसरी शिक्षा

काय म्हणाले भुजबळ?

मराठा आरक्षणाच्या अधिसूचनेनंतर छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी त्यास विरोध सुरू केला आहे. या विरोधानंतर शिवसेनेच्या शिंदे गटातील आमदार संजय गायकवाड आणि आमदार तथा शिंदे गटाचे प्रवक्ते संजय शिरसाट यांनी छगन भुजबळ यांच्यावर टीका केली आहे. संजय गायकवाड यांनी छगन भुजबळ यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करावी, अशी मागणी केली आहे. तसेच “त्यांच्या कमरेत लाथ घालून त्यांना मंत्रिमंडळाबाहेर काढा”, असे म्हटले. त्यावर भुजबळ यांनी सरकारमधले काही लोक, विरोधी पक्षातले काही नेते माझ्या राजीनाम्याची मागणी करत आहेत. विरोधक मला म्हणतायत की, सरकारचे निर्णय पटत नाहीत तर मग राजीनामा द्या. सरकारमध्ये का राहता? सरकारवर टीका करता आणि त्याच सरकारमध्ये कसे काय राहता? हिंमत असेल तर राजीनामा द्या. काल कोणीतरी बोललं या भुजबळला लाथ घालून मंत्रिमंडळाबाहेर काढा, भुजबळच्या कमरेत लाथ घालून त्याला बाहेर हाकला. मला या सर्वांना, माझ्या विरोधकांना, स्वपक्षातील आणि स्वसरकारमधील लोकांना सांगायचं आहे की, आंबड येथे १७ नोव्हेंबर रोजी ओबीसी एल्गारची पहिली रॅली झाली. त्या रॅलीच्या एक दिवस आधी, म्हणजेच १६ नोव्हेंबर रोजी मी माझ्या मंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे. मी आधी राजीनामा दिला आणि मगच आंबडच्या सभेसाठी रवाना झालो. त्यामुळे मला लाथा घालायची गरज नाही, असे भुजबळ (Chhagan Bhujbal) म्हणाले.

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.