Maratha Reservation : भुजबळ आणि जरांगे पाटलांमध्ये वाकयुद्ध सुरूच; बेवड्या, माकड, टकुऱ्या आणि बरेच काही

272

सध्या छगन भुजबळ आणि मनोज जरांगे पाटील यांच्यात मराठा आरक्षणावर (Maratha Reservation) वाकयुद्ध सुरूच आहे. दोघेही सभा घेऊ एकमेकांच्या विरोधात जहरी टीका करताना टीकेचा पातळी घसरवत आहेत. छगन भुजबळ हे जरांगे पाटील यांना बेवडा, माकड म्हणाले, तर जरांगे पाटील यांनी भुजबळ यांना टाकल्या, कलंक म्हटले.

काय म्हणाले छगन भुजबळ? 

छगन भुजबळ यांनी रविवार, १७ डिसेंबर रोजी भिवंडी येथे आयोजित ओबीसी एल्गार मेळाव्यात बोलताना म्हटले की, हा जरांगे आमची लायकी काढतो. तो काहीही बोलतो. तो मला म्हणतो, हा ‘येवल्याचा येडपाट’ आहे. आता याला काय सांगायचं? एक म्हण आहे, आधीच मर्कट आणि त्यात मद्य प्यायलेला.. म्हणजे आधीच माकड आणि त्यात बेवडा प्यायलेला… जरांगे काहीही बोलतो. अरे आमची लायकी तू काय पाहतो?  बेवडा पिऊन पिऊन तुझ्या किडन्या किडल्या त्या सांभाळ, मला धमकी देतो.

(हेही वाचा Sarathi : ‘सारथी’च्या चौकशी अहवालात दडलंय काय?)

काय म्हणाले जरांगे पाटील? 

मनोज जरांगे पाटील म्हणाले, छगन भुजबळ महाराष्ट्राला लागलेला कलंक आहे. भुजबळ तू माझ्या मागे लागू नको, टकुऱ्यावरचे चार केसही जातील. तो प्रचंड जातीवादी आहे. तो मुर्खांचा मुकादम आहे. तो महामूर्ख माणूस आहे. त्यामुळेच मी त्याला येडपट म्हणतो. माझ्या शरीराला जन्मापासून दारुचा डागही नाही. हे शरीर जनतेसाठी लढून असे झाले आहे. तुझ्यासारखे लोकांचे रक्त पिऊन शरीर वाढले नाही आणि माकड काय करू शकते? ते जरा रावणाला विचार. तुझी लंकाही जळेल, जरा नीट राहा.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.