पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर (Chenab River) भारताने ‘रक्त आणि पाणी एकत्र वाहू शकत नाही’ असं पाकला ठणकावले होते. त्यानंतर आता पाकने शनिवारी असा दावा केला आहे की, अलिकडच्या काळात भारतातून चिनाब नदीत (Chenab River) येणाऱ्या पाण्याच्या प्रवाहात ९१,००० क्युसेकने घट झाली आहे. गेल्या दोन दिवसांत भारतातून चिनाब नदीत येणाऱ्या पाण्याच्या प्रवाहात ९१,००० क्युसेकची मोठी घट नोंदवण्यात आली आहे, असे पाकिस्तानच्या जल आणि वीज विकास प्राधिकरणाने (WAPDA) सांगितले. (Chenab River)
हे राष्ट्रीय हिताच्या विरुद्ध
WAPDA च्या आकडेवारीनुसार, मराला हेडवर्क्स येथे २९ मे रोजी ९८,२०० क्युसेकवरून पाण्याचा प्रवाह कमी होऊन फक्त ७,२०० क्युसेक झाला आहे. पाकिस्तान हवामान खात्याच्या पूर अंदाज विभागाने सांगितले की, मे महिन्याच्या सुरुवातीला भारताने पाकिस्तानात होणाऱ्या पाण्याच्या विसर्गात लक्षणीय घट केल्यामुळे ही घट झाली आहे. (Chenab River)
भारताने २३ एप्रिल रोजी सिंधू पाणी करार (IWT) स्थगित केला आहे. पंतप्रधान मोदींनी सांगितले होते की, रक्त आणि पाणी एकत्र वाहू शकत नाही. म्हणजेच, पाकिस्तानमध्ये बसलेले दहशतवादी भारतात रक्त सांडत असताना, पाकिस्तानसोबत पाणी वाटणे हे राष्ट्रीय हिताच्या विरुद्ध आहे. (Chenab River)
पाकिस्तानसाठी चिनाबचे पाणी का आवश्यक आहे?
चिनाब नदी पाकिस्तानच्या शेतीसाठी, विशेषतः पंजाब प्रांतात, अत्यंत महत्त्वाची आहे. अप्पर चिनाब आणि बंबावली-रावी-बेडियान (BRB) कालव्यांसह तिचे कालवे मोठ्या प्रमाणात शेतीला सिंचन करतात. पाण्याच्या प्रवाहात दीर्घकाळ व्यत्यय आल्यास पीक उत्पादन आणि ग्रामीण उपजीविकेवर गंभीर परिणाम होऊ शकतो. (Chenab River)
चिनाब नदी जम्मू आणि काश्मीरच्या हिमालयीन प्रदेशातून उगम पावते आणि पाकिस्तानच्या पंजाब प्रांतात प्रवेश करते. ही नदी तेथील शेतीसाठी जीवनरेखा आहे. सिंधू नदी प्रणाली पाकिस्तानच्या सुमारे ८०% शेती जमिनीला सिंचन पुरवते. त्यात चिनाब, झेलम आणि सिंधू नद्यांचा समावेश आहे. पाकिस्तानला एकूण ९३% पाणी या नद्यांमधून मिळते, जे शेती, पिण्याचे पाणी आणि वीज निर्मितीसाठी वापरले जाते. (Chenab River)
ही पिके उद्ध्वस्त होऊ शकतात
चिनाब नदी ही खरीप पिकांसाठी महत्त्वाची आहे, विशेषतः पंजाबच्या मैदानी भागात. पाकिस्तानच्या सिंधू नदी प्रणाली प्राधिकरणाच्या (IRSA) सल्लागार समितीने अंदाज लावला आहे की चिनाब नदीतील पाणीपुरवठ्यात घट झाल्यास खरीप हंगामात (मे ते सप्टेंबर) २१% पर्यंत पाण्याची कमतरता निर्माण होऊ शकते. खरीप हंगामाच्या सुरुवातीला ही कमतरता आणखी तीव्र होऊ शकते, कारण या काळात पिकांना सर्वाधिक पाण्याची आवश्यकता असते. (Chenab River)
पाकिस्तानच्या अर्थव्यवस्थेत शेतीचे योगदान सुमारे २४% आहे आणि ते देशाच्या ४०% पेक्षा जास्त लोकसंख्येला रोजगार देते. पंजाब प्रांताला पाकिस्तानचा ‘धान्यखाना’ म्हटले जाते. येथील शेती चिनाब नदीच्या पाण्यावर अवलंबून असते. अशा परिस्थितीत, पाणी अडवल्यामुळे भात आणि कापसाची पिके उद्ध्वस्त होऊ शकतात. (Chenab River)
हेही पहा-
Join Our WhatsApp Community