-
प्रतिनिधी
महसूल विभागातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी वरिष्ठांच्या पूर्वपरवानगीशिवाय मुख्यालय सोडल्यास त्यांच्यावर निलंबनासह कठोर शिस्तभंगाची कारवाई करण्याचा इशारा महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी दिला आहे. जनसेवेत कसूर करणाऱ्यांची गय केली जाणार नाही, असे स्पष्ट करत बावनकुळे यांनी “एक संधी नंतर थेट कारवाई”चा पर्याय वापरला जाईल, असे जाहीर केले.
महसूल विभागाने यासंदर्भात परिपत्रक जारी केले असून, तहसीलदार ते अप्पर जिल्हाधिकारी, नोंदणी महानिरीक्षक, मुद्रांक नियंत्रक आणि जमाबंदी आयुक्त व संचालक (भूमी अभिलेख) यांच्या अधिनस्त काही अधिकाऱ्यांनी वारंवार परवानगीशिवाय मुख्यालय सोडल्याचे आढळले आहे. बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांच्याकडे याबाबतच्या तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. पडताळणीत तथ्य आढळल्यानंतर तातडीने हे परिपत्रक काढण्यात आले. त्यात म्हटले आहे की, “परवानगीशिवाय मुख्यालय सोडणाऱ्या अधिकाऱ्यांना प्रथम सक्त ताकीद द्यावी. सुधारणा न झाल्यास शिस्तभंगाची कारवाई आणि गरजेनुसार निलंबनाचा प्रस्ताव तयार करावा.”
(हेही वाचा – Pahalgam Terrorist Attack : पाकिस्तान सरकारचे ‘एक्स’ अकाऊंट भारतात ब्लॉक)
परिपत्रकात स्पष्ट करण्यात आले आहे की, शासकीय सुट्ट्या किंवा दौऱ्यावरील गैरहजेरी माफ असेल, परंतु इतर वेळी मुख्यालयात उपस्थिती बंधनकारक आहे. बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) म्हणाले, “महसूल विभाग जनसेवेसाठी आहे, जनतेला ताटकळत ठेवण्यासाठी नाही. नियमांचे पालन करून जनतेची कामे करणे अपेक्षित आहे. वारंवार गैरहजर राहणाऱ्या अधिकाऱ्यांना एक संधी देऊन नंतर थेट कारवाई केली जाईल.” या निर्णयामुळे महसूल विभागातील अधिकाऱ्यांवर जबाबदारीचे दडपण वाढले असून, जनसेवा सुधारण्यासाठी सरकारची कठोर भूमिका दिसून येते. तक्रारींच्या पार्श्वभूमीवर या कारवाईमुळे प्रशासकीय कार्यक्षमतेत सुधारणा होण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community