“… तर बाळासाहेबांनी लाथच घातली असती” ; Chandrashekhar Bawankule यांची उद्धव ठाकरेंवर जोरदार टीका

"... तर बाळासाहेबांनी लाथच घातली असती" ; Chandrashekhar Bawankule यांची उद्धव ठाकरेंवर जोरदार टीका

169
"... तर बाळासाहेबांनी लाथच घातली असती" ; Chandrashekhar Bawankule यांची उद्धव ठाकरेंवर जोरदार टीका

शिवसेना ठाकरे गटाचा नाशिकमध्ये निर्धार मेळावा पार पडला. यावेळी ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे देखील उपस्थित होते. या मेळाव्याच्या सुरुवातीला ठाकरे गटाकडून बाळासाहेब ठाकरे यांचे एआयमार्फत भाषण सादर केल्याचं पाहायला मिळालं. यावरून मंत्री चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यावर जोरदार टीका केली.

हेही वाचा-Buldhana News : बुलढाण्यात केस गळतीनंतर आता नखांची होतेय गळती !

बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) म्हणाले, “आपला आवाज कुणी ऐकत नाही, म्हणून आपले विचार हिंदूहृदयसम्राट वंदनीय शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या आवाजात ऐकवण्याचा पोरकटपणा फक्त आणि फक्त उबाठासारखा गटच करु शकतो. मला खात्री आहे, आज ज्यांनी बाळासाहेबांना जनाब ठरवले, ज्यांनी टिपू सुलतानाचे नावं उद्यानांना दिली, वीर सावरकरांचा सकाळी अपमान करणार्‍या राहुल गांधींच्या गळ्यात सायंकाळी गळे घातले, वक्फच्या विरोधात मतदान केले, राममंदिराला सातत्याने विरोध करणार्‍यांच्या मांडीला मांडी लावून बसले, 370 रद्द करणार्‍याला विरोध करणार्‍यांना पाठिंबा दिला, वाझेसारख्यांकडून वसुली करवून घेतली, डेडबॉगी बॅगमध्येही घोटाळे केले, कोविड काळात खिचडीत घोटाळे केले, मराठी माणसांच्या घरात घोटाळे करुन गल्ले भरले, त्यांच्या बुडावर बाळासाहेबांनी लाथच घातली असती.” असे बावनकुळे म्हणाले. (Chandrashekhar Bawankule)

हेही वाचा- ST Corporation : एसटी महामंडळाच्या विविध योजनांमुळे प्रवासी संख्येत वाढ ; महामंडळाची माहिती

ज्या गोष्टींसाठी वंदनीय बाळासाहेबांनी संपूर्ण आयुष्य खर्ची घातले, किमान त्याच्या विरोधात बाळासाहेबांचा आवाज वापरु नये. त्यांचे विचार बुडवलेत. किमान मृत्यूनंतर त्यांच्या आवाजाचा असा गैरवापर करु नका असे बावनकुळे यांनी बजावलं आहे. (Chandrashekhar Bawankule)

हेही पहा-

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.