Census 2027 : भारतातील पहिली डिजिटल जनगणना ! अ‍ॅपचा वापर, ३५ लाख जनगणना अधिकारी… वाचा सविस्तर माहिती एका क्लिकवर

Census 2027 : भारतातील पहिली डिजिटल जनगणना ! अ‍ॅपचा वापर, ३५ लाख जनगणना अधिकारी... वाचा सविस्तर माहिती एका क्लिकवर

56
Census 2027 : भारतातील पहिली डिजिटल जनगणना ! अ‍ॅपचा वापर, ३५ लाख जनगणना अधिकारी... वाचा सविस्तर माहिती एका क्लिकवर
Census 2027 : भारतातील पहिली डिजिटल जनगणना ! अ‍ॅपचा वापर, ३५ लाख जनगणना अधिकारी... वाचा सविस्तर माहिती एका क्लिकवर

देशात प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर जनगणनेचे (Census 2027) काम सुरू होणार आहे. भारतात स्वातंत्र्यानंतर प्रथमच जातनिहाय जनगणना होणार आहे. यासाठी, जनगणना प्रश्नावलीमध्ये जातीचा एक नवीन स्तंभ तयार केला जाईल. सरकारने नुकतीच २०२७ मध्ये जनगणना करण्याची घोषणा केली आहे, ज्यासाठी अधिकृत अधिसूचना आज (दि. १६)जारी केली जाणार आहे. सरकारने अधिसूचना प्रसिद्ध केल्‍यानंतर जनगणनेची (Census 2027) औपचारिक सुरुवात होईल. दरम्‍यान, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी रविवारी (दि. १५ जून) उच्चस्तरीय आढावा बैठक घेतली. केंद्रीय गृह सचिव गोविंद मोहन आणि भारताचे रजिस्ट्रार जनरल मृत्युंजय कुमार नारायण यांच्याव्यतिरिक्त, इतर अनेक उच्च अधिकारी बैठकीत उपस्थित होते. (Census 2027)

हेही वाचा-Air India Plane Crash : “ते घरी येत होते, पण…” ; अहमदाबाद विमान दुर्घटनेनंतर प्रख्यात चित्रपट निर्माता बेपत्ता !

२०११ प्रमाणेच यावेळीही जनगणना (Census 2027) दोन टप्प्यात केली जाईल. पहिल्या टप्प्यात म्हणजे घरांची यादी आणि घरांची मोजणी, प्रत्येक कुटुंबाची निवासी स्थिती, मालमत्ता आणि सुविधांबद्दल माहिती गोळा केली जाईल. यानंतर, दुसऱ्या टप्प्यात म्हणजे प्रत्येक घरात राहणाऱ्या प्रत्येक व्यक्तीची लोकसंख्याशास्त्रीय, सामाजिक-आर्थिक, सांस्कृतिक आणि इतर माहिती गोळा केली जाणार आहे. (Census 2027)

हेही वाचा- Israel Iran war : भारताकडून पराभूत झालेला पाकिस्तान इराणच्या मदतीला धावला ! इस्रायलला अणुहल्ल्याची धमकी …

पहिला टप्पा पुढील वर्षी एप्रिल ते सप्टेंबर पर्यंत चालण्याची शक्यता आहे. दुसरा टप्पा फेब्रुवारी २०२७ मध्ये सुरू होण्याची शक्यता आहे आणि १ मार्च रोजी मध्यरात्री संपण्याची शक्यता आहे. तथापि, केंद्रशासित प्रदेश लडाख आणि जम्मू-काश्मीर, हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंड सारख्या राज्यांमधील बर्फाच्छादित भागात १ ऑक्टोबर २०२६ च्या मध्यरात्रीपर्यंत काम पूर्ण होणे अपेक्षित आहे. (Census 2027)

हेही वाचा- Maharashtra Rain : रस्ते जलमय … हवामान विभागाकडून २३ जिल्ह्यांना अलर्ट जारी ; कुठे काय परिस्थिती?

यावेळी सुमारे ३४ लाख प्रगणक आणि पर्यवेक्षक आणि सुमारे ३५ लाख जनगणना अधिकारी जनगणनेच्या कामासाठी तैनात केले जातील. जनगणना मोबाईल अॅप्लिकेशन वापरून डिजिटल पद्धतीने केली जाईल. लोकांना स्व-गणनेची सुविधा देखील उपलब्ध करून दिली जाईल. भारतात १८७२ मध्ये जनगणना प्रक्रिया सुरू झाल्यापासून ही १६ वी जनगणना आहे. तर स्वातंत्र्यानंतरची आठवी जनगणना आहे. (Census 2027)

हेही पहा-

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.