Caste Census Union Cabinet Decision : जातीनिहाय जनगणनेच्या निर्णयाचे सर्वपक्षीय नेत्यांकडून स्वागत

73
Caste Census Union Cabinet Decision : जातीनिहाय जनगणनेच्या निर्णयाचे सर्वपक्षीय नेत्यांकडून स्वागत
  • प्रतिनिधी

देशात जातीनिहाय जनगणना करण्याच्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या निर्णयाचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह सत्ताधारी आणि विरोधी पक्षाच्या नेत्यांनी स्वागत केले आहे. या निर्णयामुळे समाजाच्या विकासासाठी सखोल धोरण ठरविण्यास मदत होणार असून सामाजिक न्यायाचा नवा अध्याय सुरु होईल, विश्वास मुख्यमंत्री फडणवीस यांनी व्यक्त केला आहे. (Caste Census Union Cabinet Decision)

शिवसेना शिंदे गटाचे मुख्य नेते तथा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या निर्णयाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानले आहेत. जातीनिहाय जनगणना करण्याचा निर्णय ऐतिहासिक आहे. महाराष्ट्र दिनाच्या पूर्वसंध्येला हे वृत्त येऊन थडकले. एकाअर्थी ही मोदी सरकारची सामाजिक न्यायाची भेट देशाला मिळाली आहे. या जनगणनेमुळे दूध का दूध, पानी का पानी होईल आणि या देशाचे वस्त्र नेमक्या कुठल्या धाग्यांनी विणले आहे हे स्पष्ट होईल, असे उपमुख्यमंत्री शिंदे यांनी म्हटले आहे. (Caste Census Union Cabinet Decision)

(हेही वाचा – Nashik Kumbh Mela 2027: साधूग्रामसाठी अतिरिक्त जागा भाडेतत्वावर घेण्यावर एकमत, ५०० एकर जागा आरक्षित केली जाणार)

जातनिहाय जनगणनेचा निर्णय म्हणजे सामाजिक समता प्रस्थापित करण्याच्या दिशेने केंद्र सरकारने टाकलेले महत्त्वपूर्ण, क्रांतीकारी पाऊल आहे, अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाचे स्वागत केले आहे. जातनिहाय जनगणना होत नसल्याने अनुसुचित जाती, अनुसुचित जमाती वगळता अन्य जातींच्या लोकसंख्येच्या आर्थिक, सामाजिक स्थितीची माहिती उपलब्ध होत नव्हती. याचा फटका ओबीसी समाज बांधवांसह इतरही समाजघटकांना बसत होता. जातनिहाय जनगणनेच्या निर्णयामुळे केंद्र आणि राज्य सरकारच्या योजना योग्य समाजघटकांपर्यंत पोहचण्यास मदत होईल. यातून सर्व समाजांना विकासाची समान संधी उपलब्ध होईल, असा विश्वास उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केला आहे. (Caste Census Union Cabinet Decision)

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनीही या निर्णयाचे स्वागत केले आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत जातनिहाय जनगणनेला मान्यता देण्यात आली असून लवकरच देशात जातनिहाय जनगणना होणार आहे. मी या निर्णयाचे सहर्ष स्वागत करतो. गेल्या अनेक वर्षांपासून जातनिहाय जनगणना व्हावी यासाठी आम्ही मागणी करत होतो. जातनिहाय जनगणनेमुळे आपल्या देशातील समतेचा विचार आणखीन दृढ होईल. असे पाटील यांनी म्हटले आहे. (Caste Census Union Cabinet Decision)

(हेही वाचा – Delhi Liquor Policy Scam: सिसोदिया आणि जैन यांच्या अडचणी वाढल्या; क्लासरूम घोटाळा प्रकरणी गुन्हा दाखल)

दरम्यान, केंद्र सरकारचा जातीनिहाय जनगणना करण्याचा निर्णय फसवा असून या माध्यमातून जनतेच्या डोळ्यात धूळ फेकण्याचा प्रयत्न आहे, अशी टीका वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी केली आहे. सरकारने अद्याप जनगणना कधी करणार? याबाबत कोणताही स्पष्ट खुलासा केलेला नाही. उलट सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रात त्यांनी स्पष्ट म्हटले आहे की, जातीय जनगणना करणे शक्य नाही. यामुळे केंद्र सरकारची भूमिका दुटप्पी आणि दिशाभूल करणारी आहे असा आरोप त्यांनी लगावला आहे. (Caste Census Union Cabinet Decision)

जातनिहाय जनगणना करण्याचा निर्णय हा केंद्रातील मोदी सरकारने घेतलेला अत्यंत क्रांतिकारक निर्णय असून, हा निर्णय सर्व समाजघटकांना न्याय मिळवून देणारा आहे, असे मत रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी व्यक्त केले आहे. रिपब्लिकन पक्षाच्या वतीने त्यांनी या निर्णयाचे स्वागत करत पंतप्रधान नरेंद्र मोदींचे अभिनंदन केले आहे. (Caste Census Union Cabinet Decision)

(हेही वाचा – बांग्लादेशमधील इस्कॉनचे पुजारी Chinmay Das यांना अखेर जामीन मंजूर!)

केंद्र सरकारने घेतलेल्या जातनिहाय जनगणनेच्या क्रांतिकारी निर्णयाचे माजी उपमुख्यमंत्री आणि अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष छगन भुजबळ यांनी स्वागत केले आहे. या निर्णयामुळे मागासवर्गीय, विमुक्त जाती, भटक्या जमाती आणि विमाप्र यांच्या सर्वांगीण विकासासाठी धोरणे आखणे शक्य होईल, असे त्यांनी सांगितले. तसेच, या निर्णयासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्र सरकारचे त्यांनी विशेष आभार मानले. (Caste Census Union Cabinet Decision)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.