Cabinet Decision : मंत्री मंडळाच्या बैठकीत मोठा निर्णय; पहलगाम हल्ल्यातील पीडित कुटुंबीयांना 50 लाखांची आर्थिक मदत जाहीर

128
Cabinet Decision : एका क्लिकवर वाचा मंत्रिमंडळ बैठकीतील ६ मोठे निर्णय

Cabinet Decision : जम्मू-काश्मीरच्या  पहलगाम येथे गेल्या मंगळवारी (22 एप्रिल) झालेल्या दहशतवादी हल्ल्यात 26 पर्यटकांचा मृत्यू झाला. त्यामध्ये महाराष्ट्रातील 6 जणांचा समावेश आहे. या मृतांच्या कुटुंबीयांना 50 लाख रुपये अर्थसहाय्य देण्याची मोठी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांनी केली. मंगळवारी २९ एप्रिलला झालेल्या मंत्रीमंडळाच्या बैठकीत मृतांना श्रद्धांजली वाहण्यात आली. त्यानंतर हा निर्णय जाहीर करण्यात आला. (Cabinet Decision)

(हेही वाचा – Pahalgam Terror Attack : “ऑपरेटरने तीनवेळा ‘अल्लाहू अकबर’ म्हटलं अन्…”, ऋषी भट्ट यांनी NIA ला सांगितला घडलेला थरार, झिपलाइन ऑपरेटरची चौकशी सुरू)

या संदर्भात मिळालेल्या माहितीनुसार पीडित कुटुंबातील व्यक्तींची रोजगार आणि शिक्षणाची जबाबदारी देखील राज्य सरकारच्या वतीने उचलण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. पीडित जगदाळे कुटुंबातील मुलीला नोकरी देण्याचा निर्णय देखील राज्य सरकारच्या वतीने घेण्यात आला आहे. या बरोबरच पहिलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात महाराष्ट्रातील मृत झालेल्या पर्यटकांना मोठ्या प्रमाणात मदत करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.

महाराष्ट्रातील 6 जणांनी गमावला जीव
22 एप्रिल मंगवार दुपारी, पहलगामच्या बैसरन व्हॅलीत फिरायला गेलेल्या पर्यटकांवर दहशतवाद्यांनी हल्ला केला. त्यानंतर हिंदू कोण, मुस्लिम कोण असं विचारत वेगळं व्हायला सांगितंल, कलमा म्हणायला सांगितला असा दावा प्रत्यक्षदर्शींनी केला. जम्मू काश्मीरमधील पहलगाममध्ये झालेल्या अतिरेकी हल्ल्यात 26 पर्यटक ठार झाले आहेत. या हल्ल्यात महाराष्ट्रातील 6 जण मृत्यूमुखी पडलेत. यात डोंबिवलीतील 3, पुण्यातील 2 व पनवेल येथील एकाचा समावेश आहे. लष्कराच्या वेशात आलेल्या या अतिरेक्यांनी पर्यटकांना प्रथम त्यांचा धर्म विचारला आणि त्यानंतर ओळखपत्र पाहून त्यांना गोळ्या घातल्या. मृतांत 2 परदेशी नागरिकांचाही समावेश आहे.

(हेही वाचा – Pahalgam Terror Attack : जम्मू काश्मीरमधील ४८ पर्यटनस्थळे बंद)

डोंबिवतील 3 मावसभावांचा मृत्यू झाला. अतुल मोने, संजय लेले आणि हेमंत जोशी हे कुटुंबियांसोबत एकत्र काश्मीर फिरायला गेले, त्यांना दहशतवाद्यांनी त्यांच्या कुटुंबियांसमोरच गोळ्या घातल्या. तर पुण्यातील संतोष जगदाळे आणि कौस्तुभ गणबोटे हो दोघे लहानपणापासूनचे मित्र, तेही त्यांच्या कुटुंबासह पहलगाम येथे गेले होते. त्यांनाही दहशतावाद्यांनी डोक्यात गोळी मारून ठार केलं. तर नवी मुंबईतील दिलीप देसले यांचाही दहशतवाद्यांच्या हल्ल्यात दुर्दैवी मृत्यू झाला.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.