धर्म विचारुनच दुकानातून सामान विकत घ्या, कुणी खोटं बोलले तर हनुमान चालीसा म्हणायला सांगा’ मंत्री Nitesh Rane यांचा हिंदूंना सल्ला

323
सागरी प्रकल्प, बंदरे, जेट्टी परिसरात अवैध बांगलादेशी आणि पाकिस्तानी नागरिक आढळल्यास कसून चौकशी करा; मंत्री Nitesh Rane यांचे निर्देश

Nitesh Rane : जम्मू-काश्मीरमधील पहलगाम (Pahalgam terrorist attack) येथील हिंसाचारानंतर देशभरात भावना तीव्र झाल्या आहेत. दरम्यान, शुक्रवारी २५ एप्रिलला मंत्री नितेश राणे हे रत्नागिरी दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी उपस्थित जनतेला संबोधित केले. म्हणाले की, “त्यांनी आम्हाला मारण्यापूर्वी आमचा धर्म विचारला. म्हणून हिंदूंनीही काहीही खरेदी करण्यापूर्वी त्यांचा धर्म विचारला पाहिजे.” असा सल्ला मंत्री नितेश राणे हिंदूंना दिला.  (Nitesh Rane)

तर हनुमान चालीसा म्हणायला सांगा
रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली येथून जनतेला संबोधित करताना नितेश राणे म्हणाले, की हिंदुंनी कुठल्याही दुकानदाराकडून काही सामान विकत घेण्यापूर्वी दुकानदाराचा धर्म विचारला पाहिजे, जर तुम्लाहा ते ही खोटं वाटत असेल तर दुकानदाराला हनूमान चालीसा म्हणायला सांगा. जर नसेल येत तर त्याच्याकडून सामान विकत घेऊ नका असेही त्यांनी म्हटले आहे.

(हेही वाचा – Bangladeshi Infiltrator : सुरत, अहमदाबादमध्ये घुसखोरांविरुद्ध मोठी कारवाई ! ५०० हून अधिक बांगलादेशी ताब्यात)

आम्ही त्यांना दूध पाजू अन् नंतर आम्हाला चावू
नितेश राणे म्हणाले की, जर ते त्यांच्या धर्माबद्दल इतके कट्टर आहेत तर आपण त्यांना श्रीमंत का बनवत आहोत? जर ते धर्मासाठी जिहाद करत असतील तर आपण त्यांच्याशी बंधुत्वाबद्दल का बोलतो? तुम्ही या धार्मिक मेळाव्यातून शपथ घ्यावी की आतापासून आम्ही फक्त हिंदूंकडूनच वस्तू खरेदी करू, मग ते कसे थरथर कापू लागतील ते पहा… आम्ही त्यांना दूध पाजू आणि नंतर आम्हाला चावू. औरंगजेबाने आपल्या वडिलांना मारले, त्याचे कुटुंब उद्ध्वस्त केले, स्वतःच्या भावाला आणि वडिलांना मारले. जे लोक स्वतःच्या लोकांसोबत उभे राहिले नाहीत, ते तुमच्यासोबत कसे उभे राहतील, याचा विचार करा.

(हेही वाचा – Sikkim landslides : सिक्कीममध्ये मुसळधार पाऊस ! भूस्खलनामुळे हजारो पर्यटक अडकले

पहलगाम हल्ल्यामुळे देशभरात संतापाची उसळली लाट
मंगळवारी २२ एप्रिलला पहलगाममधील बैसरन कुरणात दहशतवाद्यांनी पर्यटकांवर हल्ला केला. या हल्ल्यात २६ भारतीय नागरिक आणि एका नेपाळी नागरिकाचा मृत्यू झाला. इतर अनेक जण जखमी झाले. २०१९ च्या पुलवामा हल्ल्यानंतर खोऱ्यातील हा सर्वात घातक हल्ला आहे. पुलवामा येथे झालेल्या हल्ल्यात सीआरपीएफचे ४० जवान हुतात्मा झाले. या हल्ल्यानंतर संपूर्ण देशात शोककळा पसरली आहे. सरकार आणि राजकीय पक्ष या हल्ल्याचा तीव्र निषेध करत आहेत. सर्वजण दहशतवादाविरुद्ध एकत्रितपणे लढण्याबद्दल बोलत आहेत.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.