पाकिस्तान-तुर्की-अझरबैजान त्रिपक्षीय शिखर परिषदेत बोलत असताना पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ (Shahbaz Sharif ) यांनी भारताने त्यांचे नियोजित कट उधळून लावल्याचे कबुल केले आहे. भारतीय सैन्याने ९-१० मे रोजीच्या रात्री रावळपिंडीसह हवाई दलाच्या अन्य तळांवर ‘ब्रह्मोस’ क्षेपणास्त्राद्वारे हल्ले करून पाकिस्तानचे नियोजित हल्ले उधळून लावले. एवढेच नव्हे तर ज्यावेळी भारताच्या क्षेपणास्त्रांनी हल्ला केला, तेव्हा त्यांच्या सैन्याला माहितीही नसल्याचे ते म्हणाले. (Shahbaz Sharif )
सकाळच्या नमाजानंतर भारतावर हल्ला करण्याची योजना
असीम मुनीर यांच्या नेतृत्वाखालील पाकिस्तानी सैन्याने १० मे रोजी सकाळच्या नमाजानंतर भारतावर हल्ला करण्याची योजना आखली होती. तथापि, पहाटेच भारताने अनेक पाकिस्तानी लष्कराचे तळ तसेच महत्त्वाच्या ठिकाणी ब्रह्मोस क्षेपणास्त्रांनी हल्ला केला. आमच्या नियोजित हल्ल्यांची वेळ येण्यापूर्वीच, भारताने नूर खान (रावळपिंडी) आणि मुरीद (चकवाल) येथील तळ उद्ध्वस्त केले, असे शरीफ म्हणाले. दरम्यान, मुनीर यांनी त्यांना या हल्ल्याची माहिती सकाळीच दिली होती, असेही शरीफ म्हणाले. मुनीर यांना आता ‘फील्ड मार्शल’पदी बढती देण्यात आली आहे. (Shahbaz Sharif)
भारताने पाकिस्तानमधील दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त केले
ऑपरेशन सिंदूरमुळे पाकिस्तानचे मोठे नुकसान झाल्याची पुष्टी शाहबाज शरीफ यांनी करण्याची ही पहिलीच वेळ नाही. यापूर्वी, एका समारंभात त्यांनी कबूल केले होते की भारतीय क्षेपणास्त्रांनी रावळपिंडीच्या नूर खान एअरबेस आणि इतर ठिकाणी हल्ला केला होता. २२ एप्रिल रोजी पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर, भारताने पीओके आणि पाकिस्तानच्या इतर भागात दहशतवादी अड्डे उद्ध्वस्त केले आणि १०० हून अधिक दहशतवादी मारले. (Shahbaz Sharif )
भारताने पाकिस्तानचे ११ हवाई तळ उद्ध्वस्त केले
यानंतर, घाबरलेल्या पाकिस्तानने भारतीय लष्करी तळांना लक्ष्य करण्याचा अयशस्वी प्रयत्न केला. भारतीय हवाई संरक्षण यंत्रणेने पाकिस्तानी क्षेपणास्त्रे आणि ड्रोन हवेतच उद्ध्वस्त केले. त्याला प्रत्युत्तर म्हणून भारताने पाकिस्तानचे ११ हवाई तळ उद्ध्वस्त केले. भारतीय सैन्याचे शौर्य पाहून पाकिस्तानने भारतीय डीजीएमओंना फोन करून युद्धबंदीची विनंती करण्यास सुरुवात केली. त्यानंतर दोन्ही देशांमध्ये युद्धबंदी लागू आहे. (Shahbaz Sharif )
दहशतवादाला प्रोत्साहन देणाऱ्यांना मोठी किंमत मोजावी लागेल
पंतप्रधान मोदी म्हणाले की, ऑपरेशन सिंदूर हे भारतात दहशत पसरवणाऱ्यांना योग्य उत्तर आहे आणि संपूर्ण देश दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एकजूट आहे. ते म्हणाले की, ऑपरेशन सिंदूर अद्याप संपलेले नाही आणि दहशतवादाला प्रोत्साहन देणाऱ्यांना मोठी किंमत मोजावी लागेल असा इशारा दिला. (Shahbaz Sharif )
हेही पहा-
Join Our WhatsApp Community