BMC : कार्यरत स्वच्छता कर्मचाऱ्यांची नियमित हजेरी फेस रिडिंग मशिनद्वारेच ; प्रशासन आणणार वठणीवर

BMC : कार्यरत स्वच्छता कर्मचाऱ्यांची नियमित हजेरी फेस रिडिंग मशिनद्वारेच ; प्रशासन आणणार वठणीवर

2976
BMC : कार्यरत स्वच्छता कर्मचाऱ्यांची नियमित हजेरी फेस रिडिंग मशिनद्वारेच ; प्रशासन आणणार वठणीवर
BMC : कार्यरत स्वच्छता कर्मचाऱ्यांची नियमित हजेरी फेस रिडिंग मशिनद्वारेच ; प्रशासन आणणार वठणीवर

 

मुंबई (विशेष प्रतिनिधी)

घनकचरा व्यवस्थापन विभागात कार्यरत (BMC) स्वच्छता कर्मचाऱ्यांची नियमितपणे फेस रिडिंग संयंत्राच्या माध्यमातून उपस्थितीची नोंद व्हायला हवी. सहायक आयुक्त यांनी आपापल्या विभागातील स्वच्छता कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीचा नियमित आढावा घ्यावा. सहायक मुख्य पर्यवेक्षक, कनिष्ठ अभियंता आणि मुकादम यांनी परिसर स्वच्छतेचा दैनंदिन आढावा घ्यावा. त्यासोबतच प्रत्यक्ष कार्यक्षेत्रावर उपस्थित राहून आपापल्या अधिकारक्षेत्रातील परिसरात नियमितपणे परीक्षण करावे, असे निर्देश अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (शहर) डॉ. अश्विनी जोशी यांनी दिले आहेत. (BMC)

हेही वाचा-Tree Planting : १० कोटी वृक्ष लागवडीचं मोठं उद्दिष्ट… पण वन विभागाकडेच नाहीत पुरेशी रोपे!

घनकचरा व्यवस्थापनासंदर्भात पश्चिम उपनगरातील सर्व प्रशासकीय विभागांच्या कामकाजाचा डॉ. अश्विनी जोशी यांनी के (पूर्व) विभाग कार्यालयात आयोजित बैठकीत बुधवारी ११ जून २०२५ रोजी आढावा घेतला. त्यावेळी त्यांनी हे निर्देश दिले.उपायुक्त (परिमंडळ-४) डॉ. भाग्यश्री कापसे, उप आयुक्त (परिमंडळ-७) संजय कुऱ्हाडे, उप आयुक्त (सामान्य प्रशासन) किशोर गांधी, उपायुक्त (घनकचरा व्यवस्थापन) किरण दिघावकर यांच्यासह पश्चिम उपनगरातील सर्व प्रशासकीय विभागांचे (वॉर्ड) सहायक आयुक्त तसेच घनकचरा व्यवस्थापन विभागाचे अधिकारी या बैठकीस उपस्थित होते. (BMC)

हेही वाचा- जाणून घ्या कॅनबेरीमध्ये कोणते-कोणते फायदे आहेत?

मुंबई महानगर स्वच्छ आणि सुंदर ठेवण्यासाठी महानगरातील प्रत्येक मार्ग, गल्लीबोळ स्वच्छ ठेवायला हवे. रस्त्यावरील कचरा हा रोजच्या रोज उचलणे अपेक्षित आहे. यासाठी दोन सत्रांमध्ये (शिफ्ट) कॉम्पॅक्ट वाहनांचा वापर करावा. तसेच, सहायक मुख्य पर्यवेक्षक आणि कनिष्ठ अभियंता यांनी त्यांच्या अधिकार क्षेत्रातील स्वच्छता कर्मचाऱ्यांच्या प्रत्यक्ष कार्यक्षेत्रावरील उपस्थितीचा नियमित आढावा घ्यावा. सहायक आयुक्त यांनी आपापल्या विभागातील मोठ्या प्रमाणात कचरा निर्माण होणारी ठिकाणे, तेथील स्थानिक परिस्थिती आणि नागरिकांच्या वर्दळीच्या वेळा लक्षात घेऊन आवश्यकतेनुसार मनुष्यबळ वाढवून नियोजनाचा सूक्ष्म आराखडा तयार करावा, अशा सूचनाही डॉ. अश्विनी जोशी यांनी यावेळी दिल्या. (BMC)

हेही पहा-

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.