INDI Alliance : इंडी आघाडीकडून देशविरोधी वक्तव्ये, भाजपने घेतला विरोधकांचा खरपूस समाचार

भारत पाकिस्तान सीमेवर तणाव वाढला असताना भाजप आणि इंडिया आघाडी(INDIA Alliance ) यांच्यात जुंपली आहे.

43

भारत पाकिस्तान सीमेवर तणाव वाढला असताना भाजप आणि इंडी आघाडी(INDI Alliance ) यांच्यात जुंपली आहे. भाजपने काँग्रेसच्या वक्तव्याचा खरपूस समाचार घेतला. काँग्रेसच्या नेत्यांकडून लष्करविरोधी वक्तव्यावरून भाजप टीकेची झोड उठविली. इंडिया आघाडी(INDI Alliance )च्या नेत्यांची विधाने देशविरोधी आणि सैन्य दलांचे मनोबल खच्चीकरण करणारी आहेत, असे म्हणत भाजपने विरोधकांवर टीकास्त्र सोडले.

दरम्यान, ज्याप्रकारे पाकिस्तान दहशतवादी कारवाया करून नंतर आम्ही कारवाई केलीच नाही असा कांगावा करत त्याचप्रकारे इंडी आघाडी(INDI Alliance ) आम्ही सरकारसोबत आहोत म्हणायचं आणी देशविरोधी वक्तव्ये करायची, अशा शब्दांत भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते डॉ. सुधांशू त्रिवेदी यांनी टीका केली. २२ एप्रिल रोजी झालेल्या पहलगाम हल्ल्यानंतर भारत-पाकिस्तान सीमेवर तणाव असताना विरोधकांकडून अनावश्यक वक्तव्ये करण्यात येत आहेत.

(हेही वाचा मुख्यमंत्री Devendra Fadnavis दिल्ली दौऱ्यावर; नेमकं काय कारण? वाचा )

ते पुढे म्हणाले, काँग्रेसमधील दिग्गज नेते जसे की कर्नाटकचे मुख्यमंत्री सिध्दरामय्या, माजी मुख्यमंत्री चन्नी तसेच काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अजय राय हे देखील नेहमीच देशविरोधी वक्तव्ये करत असतात, असेही सुधांशू त्रिवेदी यांनी सांगितले. सबंध देशभरातून पाकिस्तानविरोधात कठोर कारवाईची मागणी असताना इंडी आघाडीतील काही नेत्यांकडून मनोबल खच्चीकरण करणारी विधाने होताना पाहायला मिळत आहेत.

डॉ. सुधांशू त्रिवेदी म्हणाले, पहलगाम हल्ल्यानंतर भारत-पाकिस्तान सीमेवर तणाव आहे. पाकिस्तान सीमेवर सतत युद्धबंदीचे उल्लंघन करत असताना, काँग्रेस आणि भारत आघाडीचे नेते लष्कराला लक्ष्य करणारी विधाने करत आहेत. एकीकडे, काँग्रेस आणि भारताचे नेते सरकारसोबत असल्याचे सांगतात, परंतु दुसरीकडे, त्यांचे नेते देशाविरुद्ध आणि सशस्त्र दलांचे मनोबल खचवणारी विधाने देतात. हे पाकिस्तान जे करते त्यासारखेच आहे, अशी टीका त्रिवेदींनी केली.(INDI Alliance )

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.