आशिष शेलारांचे उद्धव ठाकरेंना थेट आव्हान, म्हणाले…

182
आशिष शेलारांचे उद्धव ठाकरेंना थेट आव्हान, म्हणाले...
आशिष शेलारांचे उद्धव ठाकरेंना थेट आव्हान, म्हणाले...

भाजपा नेते आशिष शेलारांनी मुंबई महानगरपालिकेतील भ्रष्टाचाराबाबत जाब विचारल्यावर शिवसेना उबाठाला मिरची का झोंबते? अशा परखड शब्दात सवाल करत उद्धव ठाकरेंवर जोरदार निशाणा साधला. त्याचबरोबर, या स्टंप घेऊन आम्ही पण तयार आहोत असे थेट आव्हानही ट्वीटरद्वारे आशिष शेलारांनी ठाकरेंना दिले आहे.

आशिष शेलार नक्की काय म्हणाले?

‘मुंबई महापालिकेतील भ्रष्टाचाराबाबत जाब विचारला की उबाठाला एवढी का मिरची झोंबते? मनसेचे माजी नगरसेवक संदीप देशपांडे यांच्यावर हल्ला करता? किती स्टंप आणि बॅट तुमच्याकडे आहेत? मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभारच मानायला हवेत, त्यांनी चौकशी लावून तुमचे “कटकमिशनचे उद्योग मुंबईकरांसमोर उघडे पाडायचे ठरवलेय! तेव्हा तर दीड कोटी मुंबईकरसुद्धा तुम्हाला हिशेब विचारणार आहेत, तेवढे स्टंप आणि बॅट आहेत का तुमच्याकडे?, असा खोचक प्रश्न शेलारांनी ठाकरेंना विचारला आहे.

(हेही वाचा – २०२४च्या लोकसभा निवडणुकीत ‘हिंदु राष्ट्रा’सह हिंदुहिताच्या मागण्या पूर्ण करणार्‍यांना हिंदूंचा पाठिंबा – सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे)

तसेच पुढे शेलार म्हणाले की, ‘आम्ही तर रोज विचारणार. कोविडमध्ये “कफना”त पण “कट कमिशन कोणी खाल्ले? औषधांवरची मलाई कुणी खाल्ली? रस्त्यावरचे डांबर, नाल्यातील गाळ, शाळेतील मुलांच्या वस्तू यामध्ये कोट्यवधी कुणी लाटले? या स्टंप घेऊन आम्ही पण तयार आहोत, असे थेट आव्हानच शेलारांनी ठाकरेंना दिले आहे.

दरम्यान, मनसे नेते संदीप देशपांडे यांच्यावरती हल्ला प्रकरणी आरोपपत्र दाखल झालेले आहे. त्यामधील आरोपी अशोक खरात यांनी हे सगळे उद्धव ठाकरेंना खुश करण्यासाठी केले आहे, असा खुलासा केल्याची माहिती समोर येत आहे. यामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.