मुंबईतील सर्वात जास्त झाडांचा खून हा उबाठाचे आमदार तथा माजी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी केला आहे. महापालिकेचा जास्तीत जास्त विकास करण्याच्या नावाखाली आदित्य ठाकरे यांनी प्रत्येक वर्षी ६ ते ७ हजार झाडांची कत्तल केली आहे. त्यामुळे त्यांना दुसऱ्यांवर बोलण्याचा नैतिक हक्क नाही. असे मत भाजपाचे प्रवक्ते तथा मंत्री आशिष शेलार (Ashish Shelar) यांनी केला आहे. दरम्यान बुधवारी ११ जूनला आशिष शेलार हे कराड दौऱ्यावर आहेत. यावेळी पत्रकारांनी त्यांना प्रश्न विचारले असता, आशिष शेलार यांनी हे विधान केले. (Aditya Thackeray)
(हेही वाचा – कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांची १०० कोटींची मालमत्ता जप्त; ED ची कारवाई)
कराड दौऱ्यावर असलेले आशिष शेलार (Ashish Shelar Karad visit) यांनी, भारतीय जनता पक्ष आपली ताकद वाढवण्याचा प्रयत्न करीत आहे. त्यामुळे पक्षाची व्याप्ती वाढत आहे. भाजप मजबूत झाला तरच महायुती मजबूत होणार असून सबका साथ सबका विकास हीच भाजपची भूमिका राहिली आहे. यावेळी भाजपचे जिल्हाध्यक्ष आमदार डॉ.अतुल भोसले (Dr. Atul Bhosale), प्रदेश उपाध्यक्ष विक्रम पावसकर उपस्थित होते.
(हेही वाचा – dda recruitment : त्वरा करा; DDA ASO vacancy साठी ई-अर्ज करण्याची ‘ही’ आहे शेवटची तारीख)
त्यांना बेईमानीची व्याख्या शिकवावी लागेल
महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील (Chandrahar Patil) यांनी एकनाथ शिंदे शिवसेनेत केलेल्या प्रवेशबाबत संजय राऊत यांनी टीका केली आहे. याबाबत छेडले असता शेलार म्हणाले, खरंतर त्यांना बेईमानीची व्याख्या शिकवावी लागेल. कारण चंद्रहार पाटील यांनी केलेला प्रवेश हा स्वतःच्या मर्जीने केलेला प्रवेश आहे .या उलट महाराष्ट्राच्या राजकारणात सर्वात मोठी बेईमानी उद्धव ठाकरेंनी केली. त्याचे मूळ संजय राऊत (Sanjay Raut) आहेत. ते आमच्या बरोबर राहिले, निवडणूक लढले आणि त्यानंतर सत्तेसाठी निघून गेले. त्यांना खरंतर ‘बेईमान ऑफ महाराष्ट्र’ हा किताब दिला पाहिजे असा टोला त्यांनी लगावला.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community