Bihar Assembly Election : निवडणुकीपूर्वीच नितीश कुमार यांचा मास्टरस्ट्रोक; एनडीए सरकारने घेतला महत्त्वाचा निर्णय

Bihar Assembly Election : बिहार विधानसभा निवडणुकी(Bihar Assembly Election)च्या आधीच जेडीयू प्रमुख तथा राज्याचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या नेतृत्वातील एनडीए सरकारने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. नितीश कुमार यांच्या सरकारने विधानसभा निवडणुकीपूर्वी(Bihar Assembly Election)च एक मोठे पाऊल उचलले आहे. राज्यातील उच्च जातींसाठी स्थापन केलेल्या सवर्ण आयोगाच्या अधिकाऱ्यांची नियुक्ती केली असून राज्यातील भाजप ज्येष्ठ नेते महाचंद्र प्रसाद सिंह यांना आयोगाचे अध्यक्ष करण्यात आले आहे.(Bihar Assembly Election)

99

Bihar Assembly Election : बिहार विधानसभा निवडणुकी(Bihar Assembly Election)च्या आधीच जेडीयू प्रमुख तथा राज्याचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या नेतृत्वातील एनडीए सरकारने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. नितीश कुमार यांच्या सरकारने विधानसभा निवडणुकीपूर्वी(Bihar Assembly Election)च एक मोठे पाऊल उचलले आहे. राज्यातील उच्च जातींसाठी स्थापन केलेल्या सवर्ण आयोगाच्या अधिकाऱ्यांची नियुक्ती केली असून राज्यातील भाजप ज्येष्ठ नेते महाचंद्र प्रसाद सिंह यांना आयोगाचे अध्यक्ष करण्यात आले आहे.(Bihar Assembly Election)

(हेही वाचा “जर दहशतीचा कणा पुन्हा उभा राहिला तर…” ; PM Modi यांचा पाकला सूचक इशारा )

दरम्यान, जेडीयूचे राष्ट्रीय प्रवक्ते राजीव रंजन प्रसाद यांची आयोगाच्या उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच, दरभंगाचे दयानंद राय, पाटण्याचे जयकृष्ण झा आणि भागलपूरचे राजकुमार सिंह यांचाही आयोगात समावेश करण्यात आला आहे. बिहार सरकारच्या सामान्य प्रशासन विभागाने शुक्रवार, ३० मे २०२५ रोजी यासंदर्भात अधिसूचना जारी केली. याआधी २०११ मध्ये नितीश कुमार यांच्या नेतृत्वाखालील एनडीए सरकारने या आयोगाची स्थापना केली होती.

बिहार सरकारने सवर्ण आयोगाची केली स्थापना

बिहारमधील उच्च जातींच्या विकासासाठी एनडीए सरकारने सवर्ण आयोगाची स्थापना केली. आयोगाच्या अध्यक्षस्थानी भाजप नेते महाचंद्र सिंह यांची नियुक्ती केली आहे. तर शैलेंद्र कुमार एसटी आयोगाचे अध्यक्ष असतील तर जेडीयूचे राष्ट्रीय प्रवक्ते राजीव रंजन प्रसाद यांची उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. या आयोगाची स्थापना पहिल्यांदा २०११ मध्ये नितीश कुमार यांच्या नेतृत्वाखालील एनडीए सरकारने केली होती.

(हेही वाचा West Bengal Bangladeshi infiltrators : कूचबिहार जिल्ह्यातून महिला आणि मुलांसह २८ बांगलादेशी घुसखोरांना अटक )

सवर्ण आयोगाची स्थापना राजकीय वर्तुळात महत्त्वाची मानली जात आहे. कारण, सवर्ण जातीचे मतदार बिहारमध्ये मोठ्या प्रमाणावर आहेत. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकी(Bihar Assembly Election)च्या पार्श्वभूमीवर सत्ताधारी एनडीएकडून विरोधकांना शह देण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. एनडीए सरकार राज्यातील सवर्ण जातीच्या प्रश्न आणि विकासाला प्राधान्य देण्यात येत आहे. दुसरीकडे, अनुसूचित जमाती आणि अल्पसंख्याक आयोगांच्या नियुक्त्या देखील इतर समुदायांना आकर्षित करण्याच्या रणनीतीचा एक भाग बोलले जात आहे.(Bihar Assembly Election)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.