एकीकडे अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये पार पडलेल्या आयपीएल 2025 (Bengaluru Stampede) च्या अंतिम सामन्याला लाखोंच्या संख्येने चाहत्यांनी हजेरी लावली. तर दुसरीकडे जिंकल्यानंतर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुच्या चाहत्यांनी बंगळुरु शहरात मोठ्या उत्साहात विजय साजरा केला. मात्र या आनंदाला काळोखाची किनार लागली, जेव्हा स्टेडियमबाहेर चेंगराचेंगरीत (Bengaluru Stampede) 11 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. अनेक जण जखमीही झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. या प्रकरणावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक्स पोस्ट करत चेंगराचेंगरी दुर्घटना अत्यंत हृदयद्रावक असल्याचं म्हटलं आहे. (Bengaluru Stampede)
The mishap in Bengaluru is absolutely heartrending. In this tragic hour, my thoughts are with all those who have lost their loved ones. I pray that those who are injured have a speedy recovery: PM @narendramodi
— PMO India (@PMOIndia) June 4, 2025
“बंगळुरुमधील दुर्घटना अत्यंत हृदयद्रावक आहे. या दुःखद घटनेत ज्यांनी आपल्या प्रियजनांना गमावलं आहे, त्यांच्याबरोबर माझे विचार आहेत. या घटनेत जखमी झालेले लवकर बरे व्हावेत, अशी मी प्रार्थना करतो”, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. (Bengaluru Stampede)
7 dead. Many are battling for life after a stampede due to the irresponsibility of Congress govt.
No crowd control measures. No basic arrangements. Just chaos.
While innocent people died, @siddaramaiah & @DKShivakumar were busy shooting reels & hogging limelight with… pic.twitter.com/IVPuQjXxcq
— BJP Karnataka (@BJP4Karnataka) June 4, 2025
आरसीबीच्या विजयोत्सवादरम्यान झालेल्या चेंगराचेंगरीच्या घटनेवर प्रतिक्रिया देताना भाजपाने कर्नाटक सरकारवर टीका केली. भाजपाचे नेते बीवाय विजयेंद्र म्हणाले की, “या दुर्घटनेची संपूर्ण जबाबदारी कर्नाटक सरकारने घेतली पाहिजे. जेव्हा संपूर्ण देश कर्नाटक आरसीबीच्या विजयाचा आनंद साजरा करत आहे, तेव्हा कर्नाटक सरकारने कोणतीही पूर्व तयारी न करता विजय रॅली काढण्याची घाई केली. त्यामुळे ही दुर्घटना घडली”, असा आरोप बीवाय विजयेंद्र यांनी केला आहे. (Bengaluru Stampede)
12 dead. Yet the show goes on. Congress proves once again that photo-ops matter more than lives of Kannadigas. Karnataka will not forget this. #ResignSidduDKS
— BJP Karnataka (@BJP4Karnataka) June 4, 2025
“तसेच कर्नाटक सरकारने पूर्वतयारी केली नाही, कारण त्यांना फक्त प्रसिद्धीमध्ये रस होता. याचा परिणाम या घटनेत काही लोकांचा मृत्यू झाला. तसेच काही लोकांवर उपचार सुरु आहेत. मी आता काही पीडितांशी बोललो आहे, त्यांनी सांगितलं की रुग्णवाहिकेची सुविधा नव्हती. या घटनेची न्यायालयीन चौकशी व्हावी”, अशी मागणी भाजपाचे नेते बीवाय विजयेंद्र यांनी केली आहे. (Bengaluru Stampede)
हेही पहा-
Join Our WhatsApp Community