Bengaluru Stampede : बंगळुरूतील आरसीबीच्या विजय रॅलीत चेंगराचेंगरी(Bengaluru Stampede)त दुर्दैवी घटना घडली होती. या घटनेत ११ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली होती. या चेंगरीचेंगरी(Bengaluru Stampede) संदर्भात आता नवीन माहिती समोर आली आहे. बंगळुरू पोलिसांनी विजयी रॅलीस विरोध केल्यानंतरही कर्नाटक सरकारने रॅली आयोजनाचा घाट घातल्याचे दिसून आले आहे.(Bengaluru Stampede)
(हेही वाचा Bengaluru Stampede : कर्नाटकातील चेंगराचेंगरीच्या घटनेवर PM Narendra Modi म्हणाले … )
क्रीडा पत्रकार विक्रांत गुप्ता यांनी एका व्हिडीओच्या माध्यमातून आरसीबीच्या विजयी रॅलीत झालेल्या चेंगराचेंगरी(Bengaluru Stampede)वर भाष्य केले आहे. क्रीडा पत्रकार विक्रांत गुप्ता यांनी कर्नाटकातील काँग्रेस सरकारवर टीका केली असून यासंदर्भात नवा खुलासा केला आहे. ते म्हणाले, बंगळुरू पोलिसांनी विजयी रॅलीच्या आयोजनास नकार दिला असताना काँग्रेस सरकारने सहकार्य केले नसल्याचे म्हटले आहे. बंगळुरू पोलिसांनी सुरक्षेच्या कारणास्तव विजयोत्सव आयोजनास नकार दिला होता, असेही विक्रांत गुप्ता व्हिडिओत म्हणाले.
(हेही वाचा Bangalore Stampede: कर्नाटकातील काँग्रेस सरकारचा असंवेदनशीलपणा! आरसीबी चाहत्यांच्या मृत्यूला जबाबदार कोण? )
ते पुढे म्हणाले, चाहत्यांचा जीव गेला तरीही स्टेडियमवर सेलिब्रेशन सुरूच होते असे सांगतानाच आपण माध्यमांमध्ये जर पाहिले तर हेच बातम्यांमध्ये येत होते. विजयी रॅली होणार नाही. पार्किंगची जागा मर्यादित आहे. त्यामुळे लोकांना मेट्रो किंवा इतर सार्वजनिक वाहतुकीचा वापर करण्याचा सल्ला दिला होता, असे स्थानिक पोलिसांनी सांगितले होते. दरम्यान, पोलिसांची मनाई असूनही विजयी रॅली आयोजित केली गेली असेल तर स्थानिक काँग्रेस सरकारच्या प्रशासनाची चूक नाही तर तो कोणाचा दोष आहे, असा प्रश्न सर्वसामान्यांकडून विचारण्यात येत आहे.
SPEECHLESS 💔 pic.twitter.com/qmqQOynOLs
— BALA (@erbmjha) June 4, 2025
आरसीबीच्या विजयी रॅलीत चेंगराचेंगरी(Bengaluru Stampede)ची परिस्थिती
आयपीएल २०२५च्या अंतिम सामन्यात आरसीबीच्या यश मिळविल्यानंतरच्या विजयी रॅलीत चिन्नास्वामी स्टेडियमबाहेर झालेल्या चेंगराचेंगरीत ११ जणांचे बळी गेले होते. परंतु, काँग्रेस अजूनही यावर स्पष्टीकरण देण्यात आलेले नाही. आतापर्यंत या प्रकरणात बंगळुरू पोलिसांना एकतर्फी जबाबदार धरले जात होते. परंतु, आता जेव्हा पोलिसांनी या विजयी रॅलीला मनाई केल्याचे समोर आल्यानंतर नवा प्रश्न उपस्थित झाला आहे. स्थानिक पोलिसांची मनाई असूनही रॅली आयोजित केली गेली असेल तर यात आरसीबी चाहत्यांच्या मृत्यूस जबाबदार कोण?, असा सवाल उपस्थित होत आहे. (Bengaluru Stampede)