-
सुजित महामुलकर
कृत्रिम बुद्धिमत्तेच्या सहाय्याने शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांचा आवाज काढून त्यांच्या आवाजाची नक्कल करता येऊ शकेल, पण बाळासाहेबांच्या विचारांचे काय? ते विचार कसे आणता येणार? ज्या शिवसैनिकांनी शिवसेनाप्रमुखांची भाषणे ऐकली आहेत त्यांना चार दिवसांपूर्वी बाळासाहेबांच्या आवाजातील ‘ते’ भाषण कानाला सुखावणारे असले तरी मनाला वेदना देणारे ठरले असणार, यात शंका नाही.
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या आवाजात एक जादू होती, ओढ होती. शिवसेनाप्रमुख ५० मिनिटे सलग बोलत असले तरी आताच भाषणाला सुरुवात केली होती आणि लगेचच संपले? असा प्रश्न पडावा, असे होत असे. भाषणात राजकारण असले तरी मराठी मनाचा ठाव घेण्याची शैली, कला त्यांना अवगत होती.
(हेही वाचा – Vasai मध्ये ख्रिस्ती धर्मातून ५०६ जणांची हिंदु धर्मात घरवापसी)
गळती सुरूच…
गेल्या काही महिन्यांत शिवसेना उबाठाला मोठी गळती लागली असून अनेक नेते, पदाधिकारी, शिवसैनिक एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या शिवसेनेत प्रवेश करत आहेत. गेल्या आठवडाभरात उबाठाच्या उपनेत्या आणि प्रवक्त्या संजना आणि त्यांचे पती संजय घाडी तसेच काही माजी नगरसेवक पक्ष सोडून गेले आहेत. ही गळती काही केल्या रोखण्यात उबाठाला यश येत नाही. छत्रपती संभाजीनगरमध्ये उबाठा नेते चंद्रकांत खैरे आणि अंबादास दानवे यांच्यातील वाद पुन्हा एकदा उफाळून आला. दानवेही शिवसेनेच्या (शिंदे) वाटेवर असल्याची चर्चा आहे. तर शिवसेना उबाठाच्या राज्यसभा खासदार प्रियांका चतुर्वेदी (Priyanka Chaturvedi) यांची मुदत २०२६ मध्ये संपत असून पुन्हा उबाठाकडून राज्यसभेवर जाण्याची शक्यता नसल्याने उबाठाला सोडचिठ्ठी देण्याच्या तयारीत असल्याच्या बातम्या येत आहेत. २०१९ मध्ये त्यांनी कॉंग्रेसमधून शिवसेनेत (बंडापूर्वी) प्रवेश केला होता. उबाठामध्ये सुरू झालेले हे ‘आउटगोइंग’ शिवसेनाप्रमुखांच्या कृत्रिम बुद्धिमत्तेच्या आवाजाने थांबू शकेल का? असा प्रश्न केला जात आहे.
नवीन प्रयोग
शिवसेना उबाठाने चार दिवसांपूर्वी नाशिकला कार्यकर्ता मेळावा आयोजित केला होता. या मेळाव्यात उद्धव ठाकरे, संजय राऊत (Sanjay Raut) आणि अन्य नेत्यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. तर शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्या आवाजातील कृत्रिम बुद्धिमत्तेच्या आधारावर तयार करण्यात आलेले साधारण १५ मिनिटांचे भाषण ऐकविण्यात आले. निश्चितच हा नवीन प्रयोग शिवसेना उबाठाने दुसऱ्यांदा त्यांच्या कार्यक्रमात वापरला असला तरी त्यात एक कृत्रिमपणा होता. (Balasaheb Thackeray AI Speech)
(हेही वाचा – Kulbhushan Jadhav पाकिस्तानातील उच्च न्यायालयात करू शकणार नाहीत अपील)
आवाज शिवसेनाप्रमुखांचा, विचार उद्धव ठाकरेंचे
बाळासाहेब ठाकरे टीका करताना हातचे राखून काही बोलत नसत. जसे की नाशिकच्या मेळाव्यात भाजपावर टीका करताना त्यांच्या तोंडी, ‘माझ्या पोतडीत यांच्या बऱ्याच गोष्टी आहेत. हळूहळू काढतो, त्यातच मजा असते.’ तसेच ‘शिवसेना आहे म्हणून तुम्ही आहात,’ अशी वक्तव्ये टाकण्यात आली आहेत. शिवसेनाप्रमुखांनी अशी धमकी किंवा टोमणे मारल्याचे कधी ऐकिवात नाही. बाळासाहेब हे स्पष्टवक्ते म्हणून प्रसिद्ध होते. त्यांनी भाषण करताना कधी कशाची तमा बाळगली नाही की परिणामांची चिंता केली नाही. त्यामुळे ‘हे’ भाषण ऐकताना आवाज शिवसेनाप्रमुखांचा आणि विचार उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांचे, असा भास होत असल्याची भावना व्यक्त होताना दिसते. (Balasaheb Thackeray AI Speech)
‘तेव्हा’ सावरकरांचा उल्लेखही टाळला
याउलट उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी कॉंग्रेसशी आघाडी केल्यानंतर लोकसभा आणि विधानसभा निवडणुक काळात ‘माझ्या तमाम हिंदू बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो’ अशी भाषणाची सुरुवात करणेही सोडून दिले होते. नाशिकच्या मेळाव्यात शिवसेनाप्रमुखांच्या तोंडी स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा उल्लेख आणि ‘ही लोकशाही आम्ही मान्य करणारच नाही. हे असेच सुरू राहणार असले तर स्वातंत्र्याच्या रक्षणासाठी आम्हाला वीर सावरकरांच्या मार्गाने जावेच लागेल. होय, मी हे सावरकरांच्या नाशिकमध्ये बोलतो आहे.’ अशी वाक्ये टाकली गेली. प्रत्यक्षात मात्र कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस (शरद पवार) यांच्यासोबत गेल्यापासून ठाकरे यांनी जाहीर भाषणात कॉंग्रेस आणि राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्या भीतीने स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा साधा उल्लेख आपल्या भाषणात करणे टाळल्याचे दिसून आले आहे.
(हेही वाचा – Crime News : अपघातात मृत्यू झालेल्या महिलेच्या अंगावरील सोन्याचे दागिने पळवले ; घटना कॅमेऱ्यात कैद)
शिंदेंनी दाखवला खरा व्हिडिओ
शिवसेना नेते आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी यावर प्रतिक्रिया देताना शिवसेनाप्रमुखांचा एआयच्या मदतीने नकली आवाज काढण्याचा प्रकार म्हणजे ‘पोरकटपणा आणि थिल्लरपणा’ अशा शब्दांत टीका केली. त्यांनी साताऱ्याला दरेगावी पत्रकारांशी बोलताना बाळसाहेबांचे विचार कुणालाही मिटवता येणार नाहीत किंवा फिरवता येणार नाहीत असे सांगून कॉंग्रेसबाबत शिवसेनाप्रमुखांचे काय विचार होते, ते प्रत्यक्षात काय बोलले होते त्याची खरी व्हिडिओ क्लिप पत्रकारांना दाखवली. त्यात शिवसेनाप्रमुख म्हणतात की, ‘मी माझ्या शिवसेनेची कॉंग्रेस होऊ देणार नाही आणि जेव्हा मला वाटेल की कॉंग्रेस होतेय, त्यावेळी मी दुकान बंद करेन.’ त्याचबरोबर शिवसेनाप्रमुख ठाकरे यांनी एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्याबद्दल काय उद्गार काढले होते, त्याची व्हिडिओ क्लिपदेखील शिंदेंनी ऐकवली. (Balasaheb Thackeray AI Speech)
आत्मचिंतन, आत्मपरीक्षण करावे
तसेच ‘ते’ नकली असते तर बाळसाहेबांचा आवाज काढण्याची पाळी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यावर आली नसती, अशी टीका शिंदे यांनी यावेळी केली. अनेक नेते तुम्हाला सोडून गेले, लाखो लोक जात आहेत ते का? सोडून जाणारे सगळे वाईट, चुकीचे आहेत आणि तुम्हीच बरोबर?’ असा प्रश्न करत उद्धव ठाकरे यांनी आत्मचिंतन, आत्मपरीक्षण करावे, असा सल्लाही शिंदे यांनी दिला. (Balasaheb Thackeray AI Speech)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community