-
प्रतिनिधी
मुंबईतील मिठी नदी शुद्धीकरण, नालेसफाई आणि रस्ते विकास प्रकल्पांतील कथित भ्रष्टाचारावरून भाजपा नेते आशिष शेलार (Ashish Shelar) यांनी शिवसेना उबाठावर जोरदार हल्लाबोल केला आहे. “२५ वर्षे मुंबईत सत्तेवर राहून शिवसेना उबाठाने ठेकेदारांच्या टोळीसोबत मिळून ३ लाख कोटींचा लुटीचा बाजार मांडला,” असा गंभीर आरोप त्यांनी केला आहे.
शेलार (Ashish Shelar) यांनी एक्सवर केलेल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, “मुंबई महानगरपालिकेने ३ लाख कोटी रुपये मुंबईच्या रस्त्यांसाठी खर्च केले; पण हे पैसे शिवसेना उबाठाने (Shiv Sena UBT) आणि ठेकेदारांनी लाटले! २५ वर्षे सत्तेत राहूनही BRIMSTOWAD प्रकल्पाचे काम अपूर्ण ठेवण्यात आले, त्यामुळे आजही मुंबई पावसात बुडते!”
(हेही वाचा – Mithi River Scam : अभिनेता डिनो मोरियाची चौकशी; भावालाही आर्थिक गुन्हे शाखेचा समन्स!)
त्यांनी मिठी नदी शुद्धीकरण प्रकल्पाचाही उल्लेख करत म्हटले की, “१,००० कोटी रुपये मिठी नदीच्या सफाईसाठी खर्च करूनही कोणतीच परिणामकारकता दिसत नाही. आर्थिक गुन्हे शाखेने नुकतेच केतन के. या पार्टी फिक्सरला अटक केली असून तोच यामागील रॅकेटचा भाग आहे.” शेलार (Ashish Shelar) पुढे म्हणाले, “मे महिनाभर आम्ही – मी, भाजपा आमदार, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे – प्रत्यक्ष मैदानात उतरून नालेसफाईची पाहणी करत होतो. पण UBT युवानेते कुठे होते? ते परदेशात मौजमजा करत होते!”
“भाजपा – शिंदे – राष्ट्रवादी सरकार मुंबईतील ‘भूतकाळातील पापं’ साफ करत आहे आणि बोगस ठेकेदार टोळीवर कारवाई करत आहे, म्हणूनच Shiv Sena UBT युवा नेते आणि पक्षाची अस्वस्थता वाढली आहे,” असे म्हणत शेलारांनी (Ashish Shelar) थेट शिवसेना उबाठाच्या भ्रष्टाचारावर बोट ठेवले. शेलारांच्या या आरोपांमुळे मुंबईतील राजकीय वातावरण अधिकच तापले असून, आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर या प्रकरणाने नव्या राजकीय भूकंपाला सुरुवात झाली आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community