पंढरपुरची ‘आषाढी वारी’ (Ashadhi Wari 2025) पूर्वापार चालत आलेली परंपरा आहे. वारकरी आणि वारी राज्याचे वैभव वाढविणारी आहे. यावर्षी पावसाचे आगमन लवकर झाले असून या पार्श्वभूमीवर सर्व मानाच्या पालख्यांना आणि वारकऱ्यांसाठी पाणी, आरोग्य सुविधा, फिरती शौचालये आणि पोलीस बंदोबस्तासाठी सर्व विभागांच्या अधिकाऱ्यांनी योग्य नियोजन करावे. ही वारी यशस्वी करण्यासाठी सर्व विभागांनी समन्वयाने प्रयत्न करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. (Ashadhi Wari 2025)
हेही वाचा-Ashtavinayak Temples चा होणार जीर्णोद्धार; नियोजन विभागाकडून १४८ कोटी खर्चास मान्यता
या वेळी वारीसाठी (Ashadhi Wari 2025) जाणाऱ्या वाहनांना नेहमीप्रमाणे टोलमध्ये सवलत देण्याचे निर्देश देण्यात आले, तसेच वारीच्या वेळी व्हीआयपी गाड्या पंढरपूरला जाणार नाहीत यासाठी विशेष योजना आखण्यात येणार आहे. २६ जून ते १६ जुलैदरम्यान आषाढी वारी आहे. आषाढी एकादशीच्या अनुषंगाने मुख्यमंत्र्यांनी पूर्वतयारीचा आढावा घेत आषाढी वारीसाठी चोख व्यवस्था ठेवण्याचे आदेश प्रशासनाला दिले आहेत. (Ashadhi Wari 2025)
दरम्यान, यंदा ६ जुलै रोजी होणारी आषाढी यात्रा आगळ्या वेगळ्या पद्धतीने साजरी करण्याचे खास नियोजन आखण्यात येत आहे. यात्रेत १२ लाख वारकरी सहभागी होतील, असा अंदाज बांधूनच नियोजन सुरू आहे. कुंभमेळ्याच्या धर्तीवर वारीत महिलांच्या स्नानासाठी स्वतंत्र्य व्यवस्था करण्यात येणार आहे. (Ashadhi Wari 2025)
वारकऱ्यांची गैरसोय टाळणार- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
सध्या राज्यात मोठ्या प्रमाणात पाऊस असल्याने विविध मानाच्या पालख्यांच्या सूचना लक्षात घेवून वारकऱ्यांची गैरसोय होणार नाही, याची दक्षता शासन घेणार आहे, असे उपमुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले. शुद्ध पिण्याचे पाणी, वीज, वॉटर प्रुफ टेंट, जास्तीत जास्त आरोग्यसुविधा, फिरते शौचालये, पुरविण्यात येणार आहे. अम्ब्युलन्सबाबत कोणतीही अडचण येणार नाही, याची दक्षता आरोग्य विभाग घेईल. महिलांच्या आरोग्याबाबतही विशेष काळजी घेण्यात आली असून वारकऱ्यांना अधिक बसेस, रेल्वे उपलब्ध होण्यासाठी शासन कटिबद्ध आहे. रस्त्यावर चिखल होणार नाही, ते सुस्थितीत राहतील याची दखल घेण्यात येत असल्याचेही उपमुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले. (Ashadhi Wari 2025)
हेही पहा-
Join Our WhatsApp Community