Anurag Kashyap यांनी मागितली माफी; कारण..

अनुराग कश्यप यांनी (Anurag Kashyap) माफी मागताना इंस्टाग्रामवर पोस्ट लिहिली.

223

सोशल मीडियावरील चर्चेत ब्राह्मणांविरुद्ध अपमानास्पद टिप्पणी केल्याबद्दल अनुराग कश्यपने (Anurag Kashyap) आता जाहीरपणे माफी मागितली आहे. भविष्यात कधीही असे शब्द बोलणार नाही, अशी ग्वाहीही दिली आहे. Anurag Kashyap यांनी अलिकडेच ब्राह्मणांबद्दल खूप अपमानास्पद गोष्टी बोलल्या होत्या, त्यानंतर दिल्ली, मुंबई, इंदूर आणि जयपूरसह अनेक ठिकाणी त्यांच्या विरुद्ध तक्रारी दाखल करण्यात आल्या होत्या. वादाच्या पार्श्वभूमीवर, चाणक्य सेनेचे पंडित सुरेश यांनी अनुराग कश्यप यांचा चेहरा काळे करणाऱ्याला १ लाख रुपयांचे बक्षीस देण्याची घोषणाही केली होती.

कशी मागितली माफी? 

अनुराग कश्यप यांनी (Anurag Kashyap) माफी मागताना इंस्टाग्रामवर लिहिले की, ‘रागाच्या भरात, एकाला उत्तर देताना, मी माझ्या मर्यादा विसरलो आणि संपूर्ण ब्राह्मण समाजाबद्दल वाईट बोललो. तो समाज, ज्यातील अनेक लोक माझ्या आयुष्यात होते, आजही तिथे आहेत आणि खूप योगदान देतात. आज ते सर्व माझ्यामुळे दुखावले आहेत. माझ्यामुळे माझ्या कुटुंबाला त्रास झाला आहे. मी ज्यांचा आदर करतो अशा अनेक बुद्धिजीवी माझ्या रागामुळे आणि माझ्या बोलण्याच्या पद्धतीमुळे दुखावले गेले. असे बोलून मी माझ्या स्वतःच्या विषयापासून दूर गेलो. मी या समाजाची मनापासून माफी मागतो, ज्यांना मी हे बोलु इच्छित नव्हतो. पण रागाच्या भरात मी ते एकाच्या वाईट कमेंटला उत्तर देताना लिहिले. मी माझ्या सर्व मित्रांची, माझ्या कुटुंबाची आणि समाजाची माझ्या बोलण्याच्या पद्धतीबद्दल आणि अपशब्दांबद्दल माफी मागतो. मी त्यावर काम करेन जेणेकरून ते पुन्हा घडू नये. मी माझ्या रागावर काम करेन. आणि जर मला या विषयावर बोलायचे झाले तर मी योग्य शब्द वापरेन. मला आशा आहे की तुम्ही मला माफ कराल.’

(हेही वाचा रस्त्यात अडथळा निर्माण करणारी Mazar केली जमीनदोस्त; उत्तराखंडमध्ये प्रशासनाची धडक कारवाई)

वाद कसा सुरू झाला?

खरंतर, प्रतीक गांधी आणि पत्रलेखा स्टारर ‘फुले’ हा चित्रपट ११ एप्रिल रोजी प्रदर्शित होणार होता. हा चित्रपट समाजसुधारक ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावर आधारित आहे. ट्रेलर प्रदर्शित झाल्यापासूनच या चित्रपटावर जातीयवादाचे आरोप होत होते, त्यानंतर सेन्सॉर बोर्डाने चित्रपटात अनेक बदल सुचवले. अनुराग कश्यप (Anurag Kashyap) यांचा या प्रकरणाशी थेट काहीही संबंध नव्हता, परंतु सेन्सॉर बोर्डाचा दृष्टिकोन पाहून त्याने सोशल मीडियावर या विषयावर आपले मत मांडण्यास सुरुवात केली. त्याने ५ दिवसांपूर्वी फुले चित्रपट आणि जातीवादाच्या मुद्द्यावर एक पोस्ट शेअर केली होती.

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.