ममता बॅनर्जी मुख्यमंत्री झाल्यानंतर पश्चिम बंगालमध्ये शेकडो भाजप कार्यकर्त्यांची हत्या झाल्याची घणाघाती टीका केंद्रीय गृहमंत्री Amit Shah यांनी केली. ममता बॅनर्जी यांच्या सरकारने अराजकता, भ्रष्टाचार आणि धार्मिक तुष्टीकरणाला प्रोत्साहन दिल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला. कोलकाता येथे भाजप कार्यकर्त्यांच्या विशेष संघटनात्मक बैठकीला संबोधित करताना केंद्रीय मंत्री अमित शाह बोलत होते.(Amit Shah)
दरम्यान, आगामी २०२६ मध्ये विधानसभा निवडणुकीत भाजप राज्यात सरकार स्थापन करेल असे सांगतानाच बंगालला घुसखोरी आणि महिलांवरील अत्याचारांचा देश बनविले, असा घणाघात राज्याच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जींवर केला. ते पुढे म्हणाले, वर्षानुवर्षे बंगालवर कम्युनिस्टांचे राज्य होते. त्यानंतर, ममता बॅनर्जी ‘माँ, माती, मानुष’ ही घोषणा घेऊन आल्या. त्यांनी बंगालच्या महान भूमीला घुसखोरी, महिलांवरील अत्याचार, गुन्हेगारी, बॉम्बस्फोट आणि हिंदूंसह अनैतिकतेच्या देशात रूपांतरित केल्याची टीका अमित शाह यांनी केली. (Amit Shah)
(हेही वाचा IDF : ‘आम्ही सर्व ओलिसांना परत करू, तुम्ही बॉम्बहल्ले थांबवा’; गाझा प्रमुख ठार झाल्यानंतर हमासची नरमाईची भूमिका )
आगामी विधानसभा निवडणुकीत सत्तास्थापनेचा दावा करताना अमित शाह(Amit Shah) म्हणाले, ममता बॅनर्जी मुख्यमंत्री झाल्यानंतर पश्चिम बंगालमध्ये शेकडो भाजप कार्यकर्त्यांची हत्या करण्यात आली. दीदी, माझे ऐका, तुमचा वेळ आता संपला आहे. २०२६ मध्ये आपल्याला पश्चिम बंगालमध्ये भाजपचे सरकार स्थापन करावे लागेल. घुसखोरी थांबवावी लागेल, भ्रष्टाचार थांबवावा लागेल, हिंदूंचे पलायन थांबवावे लागेल असे सांगतानाच मुख्यमंत्री घुसखोरी रोखण्यासाठी केंद्राच्या प्रयत्नांना अडथळा आणत असल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला.(Amit Shah)
Join Our WhatsApp Community