All Party Delegation : ‘ऑपरेशन सिंदूर’ आणि दहशतवादाविरोधात सुरू असलेल्या भारताच्या लढ्याच्या पार्श्वभूमीवर सर्वपक्षीय खासदारांचं शिष्टमंडळ(All Party Delegation) विविध देशांच्या दौऱ्यावर आहे. त्यातच आता काँग्रेस नेते तथा खासदार शशी थरुर यांच्या नेतृत्वातील शिष्टमंडळाने अमेरिका, कोलंबिया येथील सरकारसमोर भारताची कणखर भूमिका मांडली. यात कोलंबिया सरकारने पाकिस्तान समर्थनार्थ वक्तव्य मागे घेत भारताच्या भूमिकेला पाठिंबा दिला. (All Party Delegation)
काँग्रेस नेते शशी थरुर यांच्या नेतृत्वातील शिष्टमंडळ(All Party Delegation) ब्राझील देशाच्या प्रतिनिधींना भेटण्यासाठी दाखल झाले आहेत. यावेळी शशी थरुर यांनी माध्यमांशी संवाद साधताना सांगितले की, भारतीय शिष्टमंडळा(All Party Delegation)ला प्रत्येक भेटीत खूप सकारात्मक अभिप्राय मिळाला आहे. ते पुढे म्हणाले, आमचं शिष्टमंडळ पाच देशांच्या दौऱ्यावर असून तीन देशांचे दौरे पूर्ण झाले आहेत. गयाना, पनामा आणि कोलंबिया दौरा यशस्वीरित्या पूर्ण केल्याचेही ते म्हणाले.
(हेही वाचा Ajit Pawar यांना धक्का! राष्ट्रवादीचे सात आमदार ‘या’ पक्षात झाले सामील )
विशेष म्हणजे शशी थरुर यांच्या नेतृत्वातील शिष्टमंडळ(All Party Delegation) ब्राझील दौऱ्यावर असून येथे बैठकाचे चर्चासत्र घेण्यात येणार आहे. थरुर यावेळी म्हणाले, भारताला निराश करणारे विधान कोलंबिया सरकारने अधिकृतरित्या मागे घेतल्यानंतर आतापर्यंत भारताला मिळालेला प्रतिसाद सकारात्मकच असल्याचे शशी थरुर यांनी स्पष्ट केले. तसेच, सुरक्षा परिषदेचे सदस्य असलेल्या गयाना आणि पनामा या दोन्ही देशांमध्ये खूप सकारात्मक प्रतिक्रिया आल्या आहेत. हेच नेमके भारताच्या दहशतवादाविरोधी ध्येयासाठी आणि लढाईसाठी एकजूट होण्याची साद असल्याचे समोर येते.
शशी थरुर एएनआयशी बोलताना भारत-ब्राझील यांच्यातील राजनैतिक संबंधांवरही भाष्य केले. ते म्हणाले, ब्राझीलमध्ये भारताला अतिशय ठोस आणि रचनात्मक चर्चा होण्याची अपेक्षा आहे. ब्राझील हा अमेरिकन उपखंडातील एक प्रमुख देश असून ब्रिक्स भागीदार देशसुध्दा आहे असे सांगतानाच भारताने २००६ पासून धोरणात्मक भागीदारीपर्यंत दोन्ही देशांनी संबंध वाढविले आहेत. ब्राझील सध्या सुरक्षा परिषदेत नसला तरी भारत आपली दहशतवादविरोधी भूमिका आणि अन्य राजनैतिक संवादाचे मार्ग खुले ठेवणे खूप महत्वाचे आहे, असे थरूर यावेळी म्हणाले.
‘ऑपरेशन सिंदूर’ची माहिती देणारे सर्वपक्षीय खासदारांचे शिष्टमंडळ
ऑपरेशन सिंदूर आणि सीमापार दहशतवादाविरुद्ध भारताच्या सुरू असलेल्या लढ्याच्या पार्श्वभूमीवर, सात सर्वपक्षीय शिष्टमंडळे या महिन्याच्या अखेरीस संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषद सदस्यांसह काही महत्त्वाच्या भागीदार देशांना भेट देत आहेत. या शिष्टमंडळां(All Party Delegation)च्या माध्यमातून भारताचा दहशतवादाविरुद्धचा राष्ट्रीय एकमत आणि ठाम दृष्टिकोन आंतरराष्ट्रीय पातळीवर मांडण्यात येत आहे. दहशतवादाच्या सर्व प्रकारांप्रती शून्य सहिष्णुतेचा भारताचा स्पष्ट संदेश हे शिष्टमंडळ जागतिक स्तरावर पोहोचवत आहेत.(All Party Delegation)
Join Our WhatsApp Community