सर्व पाकिस्तानी नागरिकांची ओळख पटली, देशाबाहेर पाठवणार; CM Devendra Fadnavis यांची घोषणा

43
Mumbra Train Accident : राज्य सरकारचा मोठा निर्णय; लोकलमधील गर्दीवर नियंत्रणासाठी सरकारी कार्यालयांची वेळ बदलणार
  • प्रतिनिधी

केंद्र सरकारच्या आदेशानुसार महाराष्ट्रातील सर्व पाकिस्तानी नागरिकांची ओळख पटवण्यात आली असून, त्यांना देशाबाहेर जाण्यास सांगण्यात आले आहे, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांनी दिली. या नागरिकांच्या हालचालींवर पोलिसांकडून बारकाईने लक्ष ठेवले जात असून, ते कशा पद्धतीने देशाबाहेर जात आहेत, याची नोंद ठेवली जात आहे. देशाबाहेर गेलेल्या नागरिकांचा अंतिम आकडा पोलिस विभाग लवकरच जाहीर करेल, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्ट केले.

विजय वडेट्टीवार यांच्या वक्तव्यावर टीका

काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांच्या वक्तव्याचा समाचार घेताना मुख्यमंत्री फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. ते म्हणाले, “अशा प्रकारची वक्तव्ये दहशतवादी हल्ल्यात मृत्यूमुखी पडलेल्या व्यक्तींच्या नातेवाइकांच्या जखमांवर मीठ चोळण्यासारखी आहेत. मृतांच्या नातेवाइकांनी याबाबत स्पष्टपणे सांगितले आहे. वडेट्टीवार तिथे गेले होते का? अशा वक्तव्यांना मूर्खपणा म्हणावा की अन्य काही, याबाबत बोलण्यास माझ्याकडे शब्द नाहीत.”

(हेही वाचा – fire temple parsi: पारशी संस्कृतीचा पवित्र जपणारा ‘अग्निमंदिर’ ठिकाणाबाबत? जाणून घ्या)

बुलेट ट्रेन प्रकल्पाला गती

मुख्यमंत्र्यांनी (CM Devendra Fadnavis) बुलेट ट्रेन प्रकल्पाबाबतही माहिती दिली. “बुलेट ट्रेनचे काम अतिशय वेगाने सुरू असून, ते २०२८ पर्यंत पूर्ण होईल. उद्धव ठाकरे सरकारच्या काळात हा प्रकल्प बंद पडल्याने अडीच वर्षांचा विलंब झाला. मात्र, गेल्या अडीच वर्षांत या प्रकल्पाने पुन्हा गती घेतली आहे. गुजरातमध्येही हे काम वेगाने सुरू आहे,” असे मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.

(हेही वाचा – Pahalgam Attack Update : मुंबईतील १७ पाकिस्तानी नागरिकांनी सोडला भारत देश)

ईडी कार्यालयातील कागदपत्रे सुरक्षित

मुंबईतील अंमलबजावणी महासंचालनालय (ईडी) कार्यालयाला लागलेल्या आगीमुळे अनेक चर्चांना उधाण आले होते. याबाबत मुख्यमंत्री फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांनी स्पष्ट केले की, “मी ईडीच्या अधिकाऱ्यांशी बोललो आहे. कार्यालयातील एकाही कागदाला धक्का लागलेला नाही. सर्व कागदपत्रांच्या मिरर इमेज (प्रती) उपलब्ध असतात.”

मुख्यमंत्री फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांनी पाकिस्तानी नागरिकांवरील कारवाई, बुलेट ट्रेन प्रकल्पाची प्रगती आणि ईडी कार्यालयातील कागदपत्रांच्या सुरक्षिततेबाबत महत्त्वपूर्ण माहिती दिली. यासोबतच, वडेट्टीवार यांच्या वक्तव्यावर टीका करत त्यांनी संवेदनशील विषयांवर जबाबदारीने बोलण्याचे आवाहन केले. या सर्व घडामोडींमुळे राज्यातील प्रशासकीय आणि राजकीय वातावरणात चर्चा तीव्र झाली आहे.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.