
-
प्रतिनिधी
राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पुन्हा एकत्र येण्याच्या चर्चांना गती मिळत असतानाच शरद पवार गटातील काही आमदारांनी थेट अजित पवार (Ajit Pawar) यांच्यासोबत जाण्याची आग्रही भूमिका मांडल्याने पक्षात नव्या घडामोडींना उधाण आले आहे. या आमदारांनी आपली भूमिका अधिकृतरित्या शरद पवार यांच्यासमोर ठेवत, त्यांच्या पुढाकाराची अपेक्षा व्यक्त केली आहे. विशेष म्हणजे, या आमदारांच्या यादीत काही मोक्याच्या आणि प्रभावी नेत्यांचा समावेश आहे. विश्वासूंच्या बैठकीत स्फोटक मते शरद पवार यांनी मंगळवारी मुंबईत घेतलेल्या विश्वासू नेत्यांच्या बैठकीत काही आमदारांनी थेट सांगितले की, “आता अजित पवारांसोबत जाण्यावाचून पर्याय नाही.” विरोधी बाकावर बसून आमदारकीच्या कामात अडचणी येत असून सत्तेतील सहभागाशिवाय मतदारसंघातील प्रश्न मार्गी लागणार नाहीत, अशी भावना त्यांनी व्यक्त केली.
या बैठकीस प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, गटनेते जितेंद्र आव्हाड, आमदार रोहित पवार यांच्यासह काही मोजके नेते उपस्थित होते. विश्वसनीय सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, उपस्थित आमदारांपैकी पाच आमदारांनी लिखित स्वरूपात स्वाक्षरी करून पत्रच शरद पवार यांच्याकडे सुपूर्त केले आहे. या पत्रात अजित पवार (Ajit Pawar) गटाशी एकत्र येण्याची विनंती करण्यात आली असून, यामध्ये सोलापूर जिल्ह्याच्या नेत्यांचा ठसठशीत सहभाग असल्याचे समजते.
(हेही वाचा – America : “आता परिणाम भोगायला तयार रहा…” अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांची इराणला धमकी)
सत्तेची गरज, राजकीय गणितांची जाणीव अनेक आमदारांना सत्तेपासून दूर राहण्याची किंमत मतदारसंघात चुकवावी लागत असल्याचा अनुभव आला आहे. केंद्र व राज्यात एकाच युतीचे सरकार असताना, शरद पवार गट विरोधात राहिल्यास विकासकामांसाठी निधी मिळवणे कठीण जात आहे, अशी भावना या आमदारांनी बैठकीत बोलून दाखवली. रोहित पवारही अजित गटासाठी सकारात्मक? या बैठकीत उपस्थित असलेले युवा आमदार रोहित पवार यांनीही अशाच स्वरूपाची भूमिका घेतल्याचे बोलले जात आहे. त्यांनी स्पष्ट शब्दांत अजित पवार (Ajit Pawar) गटाशी समन्वय साधण्याची वेळ आली असल्याचे सूचित केल्याने, पक्षातील नव्या पिढीचाही कल कोणत्या दिशेने आहे, हे स्पष्ट होत आहे.
पवारांचा मौन, पुढील धोरण अजूनही अनिश्चित या बैठकीत शरद पवार यांनी सर्वांचे विचार ऐकून घेतले असले तरी त्यांनी स्वतःची भूमिका स्पष्ट केली नाही. मात्र, आमदारांचा दबाव, जनतेची अपेक्षा आणि स्थानिक पातळीवरील वास्तव याचा विचार करता पक्षासाठी निर्णायक क्षण जवळ आला असल्याचे नाकारता येत नाही. राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण या पार्श्वभूमीवर आता पुन्हा एकदा शरद पवार व अजित पवार (Ajit Pawar) एकत्र येणार का? राष्ट्रवादी काँग्रेसचा पुनर्विलय होणार का? यावर राजकीय वर्तुळात चर्चांना पुन्हा उधाण आले आहे. येत्या काही दिवसांत या चर्चांना मूर्तरूप मिळेल की नाही, याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community