अहमदाबाद विमान अपघात (Ahmedabad Plane Crash) प्रकरणात, विमानाचा पायलट सुमित सभरवाल यांनी एअर ट्रॅफिक कंट्रोलर (एटीसी) ला पाठवलेला शेवटचा संदेश समोर आला आहे. अहमदाबाद एअर इंडिया विमान अपघात प्रकरणाची चौकशी दहशतवाद विरोधी पथक (एटीएस) करणार आहे. या प्रकरणात, अपघातस्थळावरून एक डीव्हीआर सापडला आहे, जो एटीएसने ताब्यात घेतला आहे. फॉरेन्सिक टीमनेही अपघातस्थळावरून नमुने गोळा केले आहेत, जे तपासासाठी पाठवले आहेत. (Ahmedabad Plane Crash)
विमानाने उड्डाण केल्यानंतर ४-५ सेकंदांच्या संदेशात पायलट सुमित म्हणत होता, “विमान नियंत्रणाबाहेर गेलं आहे. मेडे, मेडे, मेडे… उड्डाणाकरता जोर मिळत नाहीय. जोर मिळत नाहीये. पावर कमी येत आहे, विमान वर येत नाहीये. आपण वाचणार नाही. हे वृत्त सत्य आहे.” – माजी कॅप्टन सिकंदर रिझवी
विमान अपघाताची चौकशी ८ एजन्सी करत आहेत, ज्यात राष्ट्रीय तपास संस्था, गुजरात पोलिस, विमान अपघात तपास ब्युरो (AAIB), नागरी विमान वाहतूक महासंचालनालय (DGCA), युनायटेड किंग्डमची हवाई अपघात चौकशी शाखा (UK-AAIB), युनायटेड स्टेट्सचे राष्ट्रीय वाहतूक सुरक्षा मंडळ (NTSB), फेडरल एव्हिएशन अॅडमिनिस्ट्रेशन (FAA) यांचा समावेश आहे. (Ahmedabad Plane Crash)
NSG, NDRF, एअरफोर्स, FSL, फायर रेस्क्यू फोर्स, AAIB, DGCA आणि CISFच्या टीम अहमदाबादमधील डॉक्टरांच्या वसतिगृहाच्या छतावर पोहोचल्या आणि विमानाच्या ढिगाऱ्यांची तपासणी केली. सिव्हिल हॉस्पिटलमध्ये डीएनए सॅम्पलिंग सुरू आहे. तसेच येथे एक महत्त्वाची बैठक सुरू आहे. कुटुंबियांना कोणत्याही प्रकारची अडचण येऊ नये यासाठी चर्चा सुरू आहे. आतापर्यंत ८ मृतदेह नातेवाईकांकडे सोपवण्यात आले आहेत. २४१ जणांची डीएनए प्रक्रिया पूर्ण होणार आहे. (Ahmedabad Plane Crash)
हेही पहा-
Join Our WhatsApp Community