अहमदाबाद (Ahmedabad Plane Crash) विमानतळावरून लंडनला जाणाऱ्या एअर इंडियाच्या विमानाला अपघात होऊन 241 प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. यात एक प्रवाशी आश्चर्यकारकरित्या बचावला आहे. गुरुवारी दुपारी १:३८ वाजता मेघनानगर येथील बीजे मेडिकल कॉलेजवर विमान कोसळले. सर्वत्र आग, धूळ आणि धूर पसरला होता. अशा परिस्थितीत अपघाताच्या कारणांबद्दल अनेक अंदाज बांधले जात आहेत. (Ahmedabad Plane Crash)
१ ब्लॅक बॉक्स सापडला
एअर इंडियाच्या विमान AI-171च्या अपघाताच्या कारणांबद्दल अद्याप कोणतीही अधिकृत माहिती नाही. तथापि, अपघाताचा व्हिडिओ, उड्डाणाचा मार्ग आणि बोइंग 787-8 ड्रीमलाइनरचा इतिहास पाहता विमान वाहतूक तज्ज्ञ अपघाताच्या अनेक शक्यता व्यक्त करत आहेत. अपघातग्रस्त विमानाचा ब्लॅक बॉक्स सापडलाय. ब्लॅक बॉक्स मिळाल्यामुळे दुर्घटनेचं कारण समोर येणार आहे. विश्लेषणासाठी ब्लॅक बॉक्स दिल्लीला पाठवण्यात आलाय. तर दुसरा ब्लॅक बॉक्स अजून सापडलेला नाही. त्याचा शोध सुरू आहे. (Ahmedabad Plane Crash)
अपघात की घातपात?
तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीप्रमाणे, विमानाची दोन्ही इंजिने बिघाडामुळे एकाच वेळी बंद होणे अशक्य आहे. यात दोन शक्यता असू शकतात. एकतर, तेथे असलेल्या पक्षांच्या थव्याने विमानाला धडक देऊन दोन्ही इंजितात घुसले तर. पण याची शक्यता अत्यंत कमी आहे. आणि दुसरं, जर इंधनात पाणी असेल तर हे शक्य आहे. पण इंधनात पाणी असणे हे चुकून घडू शकत नाही. असे जर असेल तर हा निश्चित घातपात आहे. अनेक कारणांनी एक इंजिनबंद होऊ शकते.पण तसे झाले तरीही दुसरे इंजिन उड्डाण भरण्यास आणि पुन्हा परतून उतरण्यास सक्षम असते. (Ahmedabad Plane Crash)
साबरमती नदीत उतरवले असते तर …
या घटनेनंतर काहींना १५ जानेवारी २००९ रोजीच्या यूएस एअरवेजच्या विमानाच्या अपघाताची आठवण झाली. यूएस एअरवेजच्या या ए३२० विमानाला पक्षी धडकल्यानंतर, वैमानिकाने ते हडसन नदीत उतरवले होते. या घटनेत कोणत्याही प्रवाशाचा मृत्यू झाला नव्हता. एअर इंडियाचे विमान-१७१ पुढे जाऊ शकले असते, तर ते साबरमती नदीत उतरवण्याचा प्रयत्न करता आला असता आणि प्रवाशांचे जीव वाचण्याची शक्यता वाढली असती. (Ahmedabad Plane Crash)
हेही पहा-
Join Our WhatsApp Community